एक्स्प्लोर

राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला मोठा झटका, कोस्टल रोडच्या कामाला हायकोर्टाची तूर्तास स्थगिती

कोस्टल रोडच्या कामामुळे सागरी पर्यावरणाची हानी होत असून स्थानिक मच्छिमाराच्या मासेमारीमध्ये बाधा येत आहे, असा आरोप करणाऱ्या एकूण पाच याचिका न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

मुंबई : कोस्टल रोडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास स्थगिती दिली आहे. वरळीसह अन्य ठिकाणी सुरु असलेलं काम थांबवून परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश हायकोर्टाकडून जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला मोठा झटका बसला आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याची जबाबदारी असलेल्या मुंबई महानगरपालिकेला काम बंद पडल्यानं आता दिवसाला 10 कोटींचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. गुरुवारपर्यंत यासंदर्भातला सविस्तर आदेश जारी होईल, असं स्पष्ट करत हायकोर्टानं 23 एप्रिलपर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे.

कोस्टल रोडच्या कामामुळे सागरी पर्यावरणाची हानी होत असून स्थानिक मच्छिमाराच्या मासेमारीमध्ये बाधा येत आहे, असा आरोप करणाऱ्या एकूण पाच याचिका न्यायालयात करण्यात आल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने यापूर्वी समुद्रात आणखी भराव टाकून काम करण्याला मनाई केली होती. मात्र असे असतानाही वरळी, नेपियन्सी रोड, ब्रीच कॅण्डी, टाटा उद्यान या संबंधित भागांत भराव टाकण्याचे काम सुरूच असल्याचा दावा याचिकादारांच्यावतीन हायकोर्टात करण्यात आला.

नरिमन पॉईंट ते कांदिवलीला जोडणारा हा 34.56 किलोमीटर प्रकल्प असून एकूण 70 लाख 22 हजार 800 चौ. मी. चं हे संपूर्ण बांधकाम असणार आहे. यासाठी एकूण 168 हेक्टर जमीन ही समुद्रात भराव टाकून तयार करण्यात येणार आहे. मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कोस्टल रोडशिवाय पर्याय नाही, असं पालिकेच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. बोरिवली-दहिसर या उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरात येण्यासाठी सध्या किमान 3 तासांचा अवधी लागतो. त्यामुळे कोस्टल रोड ही आजच्या घडीला काळाची गरज असल्याचं तज्ञांच्या समितीनं आपल्या अहवालात म्हटलं असून हा प्रकल्प अत्यंत गरजेचा असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. तसेच हा कांदळवनाचा भाग नसल्यानं पर्यावरणाला कोणतीही मोठी हानी पोहचणार नाही, असा राज्य सरकारचा दावा आहे.

मात्र या कोस्टल रोडमुळे सागरी जैवविविधता नष्ट होऊन किनाऱ्यालगच पैदास होणा-या कोलंबी, खेकडा, शिंपले यांसारख्या मासळीच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. जर कोणत्याही कामामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर तो थांबविण्याचा किंवा किमान कमी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. समुद्रामधील जैव आणि नैसर्गिक संपत्तीला अपरिमित नुकसान होण्यापासून थांबविण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात आणि त्याला बंधनेही घालायला हवीत, असं मत यावेळी न्यायालयानं व्यक्त केलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
तरुणाचा जीव वाचवण्यासाठी कामगाराची थेट समुद्रात उडी, विरार जेटीवर थरार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
तरुणाचा जीव वाचवण्यासाठी कामगाराची थेट समुद्रात उडी, विरार जेटीवर थरार, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Embed widget