एक्स्प्लोर

वर्सोवा-लोखंडवाला लिंक रोडचा मार्ग मोकळा, विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

कांदळवनांसोबतच लिंक रोडच्या कामामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होणार आहे. तसेच या कामात पर्यावरण संवंर्धनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.

मुंबई : अंधेरीतील वर्सोवा-लोखंडवाला लिंकरोडमुळे या परिसरातील कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. याचिकाकर्त्यांनी वैयक्तिक कारणासाठी याचिका दाखल केली असून त्यात कोणतेही जनहित आढळून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावत ही याचिका फेटाळून लावली.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने बांधण्यात येणार आहे. यामुळे तिथल्या कांदळवनाचा बळी जाणार असल्याचा आरोप करत वर्सोवातील 'जय भारत' सोसायटीतील काही सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

कांदळवनांसोबतच लिंक रोडच्या कामामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होणार आहे. तसेच या कामात पर्यावरण संवंर्धनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला होता. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एमएमआरडीएसह, पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारला यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत या कामाला दिलेली स्थगिती दिली होती.

या याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी केवळ वैयक्तिक कारणासाठी ही याचिका दाखल केली असून त्यामागे कोणतंही सार्वजनिक हित दिसत नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आसून वर्सोवा-लोखंडवाला लिंक रोडचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget