एक्स्प्लोर

बड्या अधिकाऱ्यांना शासनाचा दणका, मुंबईतील घरभाड्याचे कोट्यवधी रुपये बाकी, दंड वसूली करणार

बदली किंवा सेवानिवृत्त झाल्यावर घरं कायम ठेऊन बड्या अधिका-यांनी घराचं लाखो रुपयाचं भाडं थकवल्याचं समोर आलं आहे.जवळपास 87 अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनातून किंवा वेतनातून ही भाडेवसूली करण्यात येणार आहे.

मुंबई: मुंबईतल्या घराचा मोह कोणाला नसतो त्यात शासकीय निवास स्थान असेल तर बात काही औरच … असंच काहीसं झालंय बड्या अधिकाऱ्यांचं. जवळपास 87 अधिकाऱ्यांनी बदली आणि सेवानिवृत्त झाल्यावर मुंबईत घर कायम ठेवली होती पण त्यांना हे प्रकरण चांगलंच महागात पडणार आहे. बदली किंवा सेवानिवृत्त झाल्यावर घरं कायम ठेऊन बड्या अधिका-यांनी घराचं लाखो रुपयाचं भाडं थकवल्याचं समोर आलं आहे या सगळ्या अधिकाऱ्यांना आता शासनानं दणका देण्याचं ठरवलं आहे अधिकाऱ्यांची दंडनीय रक्कम देखील लाखोंच्या घरात आहेत. जवळपास 87 अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनातून किंवा वेतनातून ही भाडेवसूली करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने 87 अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांच्याकडून अपेक्षित घरभाड्याची रक्कम याचे तपशील दिले असून, त्यात आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

बदली झाल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतरही बरेच सरकारी अधिकारी त्यांना दिलेल्या निवासस्थानातच राहतात. तर काही जणांनी ती बराच काळ वापरून मग सोडली, तर काही जणांनी ती अद्याप सोडलेली नाहीत. यामुळे बाहेरून मुंबईत बदली होऊन आलेल्या अनेकांना सरकारी निवासस्थानांसाठी खोळंबून राहावे लागते. त्यामुळे मुदतीनंतरही सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या निवृत्तिवेतनातून, तर बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून घरभाडे वसूल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कोण कोण आहेत हे अधिकारी ?

नाव                                             रक्कम 

राजेश नार्वेकर                    60 लाख 74 हजार 737 रुपये

डॅा उषा यादव                     30 लाख 93 हजार 300 रुपये 

सुरेश पेडगांवकर               21 लाख 34 हजार 760 रुपये 

अमिताभ गुप्ता                   15 लाख 88 हजार 155 रुपये 

ज्योती भोसले                   18 लाख 79 हजार 500 रुपये 

अतिश सोनी                      14 लाख 7 हजार 259 रुपये 

के पी बक्षी                        13 लाख 24 हजार 607 रुपये 

प्रशांत साळी                    १२ लाख ५० हजार ५०८ रुपये 

दिलीप शिंदे                      11 लाख 15 हजार 100 रुपये 

श्रीकांत सिंह                      10 लाख 97 हजार 185 रुपये 

मोहम्मद अक्रम सहिद        8 लाख 41 हजार 212 रुपये 

केशव इरप्पा                     9 लाख 41 हजार 26 रुपये 

सुनिल सोव्हितकर             2 लाख 48 हजार 735 रुपये 

शिरिष मोरे                        2 लाख 13 हजार 735 रुपये 

सुधीर श्रीवास्तव                 1 लाख 58 हजार 375 रुपये 


सेवानिवृत्ती-बदलीनंतरही अधिकारी घर सोडेनात, सरकारला घ्यावा लागला हा निर्णय 

सेवानिवृत्ती आणि बदलीनंतरही अनेक अधिकारी सरकारची घर सोडताना दिसत नाही. ते सरकारी घरातच राहत असतात अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने दणका दिला असून, या अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून भाडेवसुली करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. जवळपास 87 अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनातून किंवा वेतनातून ही भाडेवसुली करण्यात येणार आहे. 

सामान्य प्रशासन विभागाने 87 अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांच्याकडून अपेक्षित घरभाड्याची रक्कम याचे तपशील दिले असून, त्यात आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घर सोडले असले तरी सेवानिवृत्ती-बदलीनंतर ताब्यात ठेवलेला कालावधी हा घरभाडे वसुलीची रक्कम निश्चित करण्यासाठी मोजण्यात आला आहे. दरम्यान घर ताब्यात असेपर्यंतच्या कालावधीचे घरभाडे त्यांच्या निवृत्तिवेतनातून वा वेतनातून वसूल करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने कोषागार कार्यालयाला पत्र पाठवले आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget