एक्स्प्लोर

घाटकोपर विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सीबीआय आणि हवाई वाहतूक मंत्रायलायाला नोटीस पाठवून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय आणि हवाई वाहतूक मंत्रायलायाला नोटीस पाठवून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळील फनेल क्षेत्रातील उंच इमारतींविरोधात याचिका करणाऱ्या यशवंत शेणॉय यांनीच ही याचिका नव्यानं दाखल केली. दरम्यान खरंच मुंबई हवाई दुर्घटनेच्या दृष्टीनं सुरक्षित आहे का? असा सवालही या याचिकेतून विचारण्यात आला आहे.

घाटकोपर विमान दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात 28 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.

हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur News : 'बेकायदेशीर कर्ज नाकारल्याने छळ', Solapur च्या Kistt Finance मधील 10 जणांवर गुन्हा
Goa Hostage Drama: 'जी Story सांगितली, तीच त्याने प्रत्यक्षात केली'; अभिनेत्री Ruchita Jadhav चा धक्कादायक खुलासा
Sindhudurg Rains: 'भात उत्पादक शेतकरी हवालदिल', सिंधुदुर्गात कापलेलं पीक पाण्याखाली
Maharashtra Politics:'ज्या बडव्यांमुळे सेना सोडली, राज ठाकरे आता त्यांच्याकडेच जातायत'- संजय शिरसाट
Mumbai Hostage Crisis: 'A Thursday' पाहून Rohit Arya ने १७ मुलांना ओलिस ठेवले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
डॉक्टर तरुणीवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव; सुषमा अंधारेंनी आणखी एक पुरावा समोर आणला
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
मुख्यमंत्री म्हणाले जूनमध्ये कर्जमाफी करतो, उद्धव ठाकरेंचं खरमरीत पत्र; शेतकऱ्यांना झुलवू नका म्हणत अनेक सवाल
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Embed widget