एक्स्प्लोर

रस्ता नसल्याने उपचार मिळायला उशीर, एका महिन्यात सरपंचासह दोघांचा सर्पदंशाने मृत्यू, मुरबाडमधील गावातील भयाण वास्तव

Thane Murbad News Updates : रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे.  मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.

Thane Murbad News Updates : रस्ता नसल्याने एक महिन्यात वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जणांचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे. मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावात ही घटना घडली आहे.  मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वाट्याला आलेलं हे भयाण वास्तव आहे.  मुरबाड तालुक्यातील ओजिवले गावातील (Murbad News) सरपंच आणि एका गावकऱ्याला सर्पदंश झाला होता. सर्पदंश झाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात जायचं न्यायचं होतं, मात्र गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावात येणे शक्य नव्हतं. 

सरपंचांनंतर त्यांच्या जावयाचाही सर्पदंशानं मृत्यू

अखेर गावकऱ्यांनी या दोघांना डोली करत रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात न्यायला उशीर झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. बारका बाई हिलम या ओजीवले गावाच्या सरपंच होत्या. त्या शेतात काम करत असताना 8 ऑगस्ट रोजी त्यांना शेतात सर्प दंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्यांना झोळी करत रुग्णालयापर्यंत नेले. मात्र गावात यायला रस्ता नसल्याने गावकऱ्यांना एक ते दीड किलोमीटरची पायपीट करीत झोळीतून त्यांना रुग्णालयात न्यावं लागलं. उपचार उशीरा मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जावई सुभाष वाघ यांना देखील 5 सप्टेंबर रोजी पहाटे घरात झोपलेले असताना सर्पदंश झाला. मग त्यांना देखील बारकाबाई प्रमाणेच झोळीतून पहाटे रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना ही रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्याने त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. 

 कोणतेच वाहन गावापर्यंत येत नाही

या ओजिवले गावात यायला रस्ता नाही, जो खाजगी आणि वनविभागातून जाणारा रस्ता आहे तो पावसाळ्यात पूर्ण चिखलमय झालेला असतो. त्यामुळे इथे कोणतेच वाहन गावापर्यंत येत नाही, गावात रस्ता असता तर आमच्या नातेवाईकांची जीव वाचले असते. मात्र गावकरी रस्त्यासाठी जागा द्यायला तयार नाहीत आणि प्रशासन देखील त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केलाय. 

 सरपंचाचाच असा मृत्यू होत असेल तर इतरांनी काय करावे?

मुरबाडपासून 27 किमी अंतरावरील धसई बाजारपेठेजवळील ओजिवले गावच्या हद्दीत दीड किमी अंतरावर कातकरवाडी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठीची दीड किमी पायपीट करावी लागते. पावसाळ्यात चिखलातून वाट काढत रुग्ण आणि तेथील नागरिकांना जावे लागते. रस्त्या अभावी जर गावातील सरपंचाचाच असा मृत्यू होत असेल तर इतरांनी काय करावे असा सवाल आता उपस्थित होतोय.

मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावांना अजूनही रस्ते नाहीत, त्यामुळे याच्या विरोधात सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करून पत्रव्यवहार करून ही बाब लक्षात आणून दिली आहे. मात्र प्रशासन त्याकडे अजूनही लक्ष देत नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री झाले असून त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर या गावांना रस्ता करून द्यावा अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget