एक्स्प्लोर

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

कोरोनाचा विसर पडणे हाच सध्याच्या घडीला मोठा धोका असल्याचे मत, या क्षेत्रात काम करण्याऱ्या आणि या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

कोरोनाचा (Coronavirus) धोका आधीही टळला नव्हता आणि अजूनही टळलेला नाही, हे वैद्यकीय तज्ज्ञांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. मात्र तरीही अनेक नागरिक कोरोनाचा नायनाट झाल्याच्या अविर्भावात सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून समाजात वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.  या अशा पद्धतीने फिरणाऱ्यांचा हा आकडा कमी असला तरी यांच्यामुळे समाजाला मोठ्या प्रमाणात धोके संभवतात. प्रशासन आणि  खासगी, शासकीय, महापालिका  आरोग्य यंत्रणेच्या या अथक परिश्रमानंतर कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यात यश संपादन झाले असले तरी कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही, त्यामुळे सर्व स्तरावर आजही सातत्याने प्रयत्न सुरु आहेच. त्यामुळे कोरोनाचा विसर पडणे हाच सध्याच्या घडीला मोठा धोका असल्याचे मत, या क्षेत्रात काम करण्याऱ्या आणि या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दिवाळीनंतर ज्या पद्धतीने बाहेरच्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली त्यापद्धतीने आपल्या देशात आणि राज्यातही परिस्थिती गंभीर वळण घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आपल्याकडे अजून पाहिलीच लाट ओसरली नसल्याने दुसऱ्या लाट येणायचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्याचा आरोग्य विभाग दैनंदिन अहवाल सादर करत असतो त्यामध्ये राज्यातील एकंदरच कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी असल्याचे दिसले आहे. मृतांच्या आकड्यातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही आकडेवारी पाहता काही  नागरिकांनी तर मास्क घालण्याचे सोडून दिल्याचे महापालिकेच्या कारवाईतून दिसून आले. रस्त्यांवरची वर्दळ वाढली आहे. या सगळ्या प्रकारात कोरोनाची साथ आजही राज्यात आहे याचा त्यांना विसर पडला आहे हीच धक्कादायक बाब स्पष्ट होतेय.

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे परळ येथील के. इ. एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख सांगतात की, "जर आपल्यावर पूर्वीसारखी परिस्थिती ओढवायची नसेल, तर नागरिकांनी सजग राहणे फार गरजेचे आहे. कोरोनाच्या नव्या प्रजातीचा हाहाकार पाश्चिमात्य देशांत झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे. सध्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रांत आहे म्हणजे सगळे आलबेल झालं आहे आणि आता चिंता करायची गरज नाही असा खोटा समज बाळगणे खूप धोकादायक आहे. प्रत्येकाने सुरक्षिततेचे नियम आणखी काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. कारण जो नवीन विषाणू आहे त्याचे संक्रमण खूप वेगाने होते आणि त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. "

Corona मुळं नोकरी गेली, पण एका फोन कॉलनं नशीब उघडलं

आपल्याकडे नवीन वर्षाचे स्वागत  म्हणजे एक मोठा उत्सव साजरा केल्यासारखा साजरा केला जातो. त्यात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर, उपहारगृहात  या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र या वर्षी कोरोना या संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळून साधेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे यावेळी विविध स्तरातून आवाहन करण्यात आले आहे.

"नागरिक कोरोना विसरले आहेत. कारण, ते आता खूप कंटाळले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अनेकांच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.  नातेवाईकांना भेटता येत नाही. नागरिकांच्या मानसिकतेवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होण्यास सुरवात झाली आहे. एकंदरच या सगळ्या वातावरणात मोकळीक मिळाल्यास ते क्षण त्यांना आनंदात घालवायचे असतात. हे सगळे वास्तव खरे असले तरी या आजाराचे गंभीर स्वरूप बघता सगळ्यांनी सुरक्षितता आणि त्या दृष्टीने आखलेले नियम पाळलेच पाहिजे. कारण आरोग्यापुढे सगळ्या गोष्टी निरर्थकच. त्यामुळे नागरिकांनी याचा कोरोनाची साथ अजूनही हे लक्षात ठेवून वागले पाहिजे." असे लीलावती रुग्णालयातील वरिष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं.

वरिष्ठ आणि मुख्य म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेला हा उशारा पाहता, कोरोनाचा प्रभाव काही अंशी कमी दिसत असला तरीही हे संकट काही टळलेलं नाही हेच स्पष्ट होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget