![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? असा प्रश्न करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे दुसरे पत्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
![रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Devendra Fadnavis send letter to Chief Minister over corona patient deaths रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/18230159/pune-fadnavis.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रुग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे 1000 मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत ज्या रुग्णांचा मृत्यू रुग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर 72 तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतु, तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करुन ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.
राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी
चूक विश्लेषणासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत मुळात कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले, किती रुग्णसंख्या आढळली, म्हणजे संसर्ग (इन्फेक्शन) किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच आणि रणनीती आखून त्याला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, ही विलंबाची पद्धत बंद करुन अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल, हा विश्वास वाटतो, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा पत्र असेच एक पत्र यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना 15 जून 2020 रोजी पाठविले होते. सुमारे 950 मृत्यू कोरोनामुळे झालेले असताना सुद्धा ते त्यावेळी दाखविण्यात आलेले नव्हते. त्यानंतर 16 जून 2020 रोजी मुंबईत 868 आणि मुंबईसह राज्यात एकूण 1328 मृत्यू अधिकचे दाखविण्यात आले. मुंबईत या 868 च्या व्यतिरिक्त सुमारे 350 जुने मृत्यू दरम्यानच्या काळात अधिक करण्यात आले. (जे प्रारंभी अपात्र ठरविण्यात आले, मात्र अपात्र ठरू शकत नाहीत, असे लक्षात आल्यावर ते दाखविण्यात आले.) म्हणजेच असे एकूण 1200 हून अधिक मृत्यू एकट्या मुंबईतील जुने परंतू नंतर दाखविण्यात आले आहेत. अशाच प्रकारात मोडणारी ही दुसरी बाब आहे.
Coronavirus | कोरोनामुळे मुंबईतल्या डबेवाल्याचा पहिला बळी, मालाडमधील 39 वर्षीय डबेवाल्याचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)