एक्स्प्लोर

डिझेल दरवाढीचा फटका, मुंबईत जीवनावश्यक वस्तू महागणार!

डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे आता आपल्याला भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे.

नवी मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे आता आपल्याला भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे. येत्या शुक्रवारी ही भाडेवाढ होणार असल्याने याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होणार आहे. भाडेवाढ अटळ? भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा, अन्नधान्य यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. याचा परिणाम म्हणजे महागाई गगनाला भिडणार आहे. दुसरीकडे वाढलेले भाडे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. येत्या शुक्रवारी मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघाची बैठक होणार आहे. यात 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. पेट्रोलजन्य पदार्थांबरोबर इन्शुरन्स, टायर किंमती वाढल्या असून चालकांचे पगारही वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधून मुंबईच्या विविध भागात पिकप व्हॅन आणि टेम्पोने भाजीपाला, फळे आणि कांदा, बटाटा नेण्यात येतो. या सर्व मार्गांच्या सध्या असलेल्या भाड्यात 20 ते 30 टक्के वाढ होणार आहे. मार्ग                                   सध्याचे भाडे                वाढणारे भाडे एपीएमसी मार्केट ते दादर  - 1200 ते 1500           1500 ते 2000 एपीएमसी मार्केट ते अंधेरी - 1500 ते 2100            2000 ते 2500 एपीएमसी मार्केट ते बोरीवली - 2000 ते 2500       2600 ते 3200 एपीएमसी मार्केट ते कुलाबा - 2000 ते 2500         2600 ते 3200 एपीएमसी मार्केट ते वसई-विरार – 3000 ते 3500    3700 ते 4300 शेतकऱ्यांनाही फटका नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये बाहेरुन येणाऱ्या शेतीमाल वाहतुकीचंही भाडं वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातून वाशी एमपीएमसीत येणाऱ्या भाजीपाला, कांदा बटाटा, फळ आणि अन्यधान्य यांच्या गाड्यांचेही भाडे वाढणार असल्याने याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एपीएमसीमध्ये माल पोहोचवण्याचं भाडं शेतकरी देत असल्याने भाडे वाढल्यास शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे जाणार आहेत. मालाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. शेतकरी एकीकडे अगोदरच झळ सोसत असताना जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरी ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. संबंधित बातम्या :

... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल

पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?

पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget