एक्स्प्लोर
Advertisement
CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत काही महत्वाच्या सूचना केल्या तसेच पोलिस, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
मुंबई : कोरोनाचा गुणाकार काळ आता सुरु झालाय, पहिल्या पायरीवर कोरोना थांबवला तरच अटकाव शक्य आहे. ही आणीबाणीची स्थिती, विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलं. यावेळी त्यांनी कोरोनाशी सुरु असलेल्या या युद्धात कार्यरत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना मानाचा मुजरा करत आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या या परिस्थितीत मोठी दुर्घटना घडेल असं काही करु नका. स्थलांतर करु नका, आपण जिथं आहात तिथं थांबा, तुमची व्यवस्था करण्यात येईल. सरकारला विनाकारण कठोर पावलं उचलायला लावू नका. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवरचा ताण वाढवू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले की, कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
त्यांनी सांगितलं की, एक चांगली टीम तयार झाली आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातलं आहे. कोणताही देश कोणत्याही देशाच्या मदतीला धावून येत नाही असं चित्र आहे. ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे ते भीषण आहे. ती दृश्यं पाहिल्यानंतर ते चित्र भयंकर आहे. इतर राज्यातल्या कामगारांनी महाराष्ट्र सोडू नये. त्यांची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार. राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आम्ही करतो आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.
डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिसांचे मानले आभार
यावेळी त्यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत प्रत्येकाचे आभार मानले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करतो. ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. या उर्जेला काय म्हणायचं? आरोग्य विषयक समस्येशी लढणाऱ्या या सगळ्या वीरांना माझा मानाचा मुजरा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मी पोलिसांचेही आभार मानतो आहे. कारण पोलिसांचे काम हे देखील डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहे. आपण सक्तीने घरी बसावं यासाठी ते बाहेर काम करत आहेत. त्यांचेही मी धन्यवाद देतो. घराबाहेरची लढाई तुमचंच सरकार लढतं आहे. तुम्ही फक्त घरात राहून आम्हाला साथ द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement