एक्स्प्लोर

विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस, विविध विकासकामांचीही माहिती

मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पामुळे कुठलाही कोळीवाडा बाधित होणार नाही. मच्छिमारांची जागा कोस्टल रोडसाठी सरकार घेणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगिलं.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, नाशिक आणि पुणेकरांसाठी आज विधानसभेत महत्वाच्या घोषणा केल्या. पुढच्या वर्षभरात अनेक महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलं. तसेच मुंबई आणि पुण्यातील अंतर अर्ध्या तासावर आणण्यासाठी हायपरलूप प्रकल्प लवकरच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

कोस्टल रोडसाठी मच्छिमार बांधवांची जागा जाणार नाही मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पामुळे कुठलाही कोळीवाडा बाधित होणार नाही. मच्छिमारांची जागा कोस्टल रोडसाठी सरकार घेणार नाही. कोस्टल रोडमुळे एकही मच्छिमार प्रकल्पबाधित होणार नाही. मात्र तरीही कुणी बाधित झालंच तर ट्रान्सहार्बर लिंक करताना बनवलेल्या फॉर्म्युल्यानुसार भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांची जाहीर केलं.

भूमिगत मेट्रोचं 50 टक्के काम पूर्ण मेट्रो प्रकल्पाचं काम वेगाने सुरु आहे. मेट्रोच्या भूमिगत मार्गाचं 50 टक्के काम पूर्ण झालं आहे. याचा 2021 ला पहिला टप्पा आणि 2022 ला दुसरा टप्पा पूर्ण करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दहिसरला जाणाऱ्या मार्गाचं 65 टक्के काम पूर्ण झालं आहे. वांद्रे-मंडाले, ठाणे-भिवंडी -कल्याण, कासारवडवली - गायमुख हे मार्ग 2022 पर्यंत पूर्ण करु, दहिसर ते अंधेरी पूर्व 68 टक्के काम पूर्ण झालं असून हा प्रकल्प 2020 साली पूर्ण होईल. दहिसर-मीरा भाईंदर मार्गाचं लवकरच टेंडर देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नवी मुंबईतील मेट्रो 2020 च्या सुरुवातीला काम पूर्ण होईल. पहिला मेट्रोला मंजुरीसाठी 5 वर्षे लागली तर इतर मेट्रोसाठी एक वर्षाच्या आत परवानग्या मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनची क्षमता 50 टक्क्यांनी वाढवणार असून यासाठी एलवेटेड मार्ग तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांची जाहीर केलं. यासाठी केंद्र सरकारकडून मदत घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नाशिकचा डीपीआर तयार नाशिकला हायब्रीड मेट्रोचा प्रयोग करत आहोत. हायब्रीड मेट्रो इतर मेट्रोसारखीच असते पण रुळांऐवजी चाकांवर चालते. यावर इलेक्ट्रीक बसही चालते. छोट्या बॅटरीची बस फीडर म्हणून वापरून या मार्गावर चालू शकते आणि पुन्हा उतरून 20 किमी चालवून लोकांना या हायब्रीड मेट्रोला जोडू शकते. नाशिकचा डीपीआर तयार झाला आहे. तो लवकरच कॅबिनेट मध्ये मंजुरीसाठी येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असेल एसआरए पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. विकासक रहिवाशांना काही काळानंतर भाडे देत नाहीत. यासाठी 3 महिन्यांचं ऍडव्हान्स भाडं घ्यायचा निर्णय सरकारने आज घेतला आहे. तसेच बीडीडी चाळीतील ना. म. जोशी मार्ग येथील स्थलांतरण सुरू झालं असून वरळीतील 14 चाळीचे सर्व्हेक्षण झाले आणि लवकरच तेथील तर स्थलांतरण सुरू होईल. येथील रहिवाशांना 500 चौ. फुटापेक्षा मोठं घर मोफत मिळणार आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

इतर महत्त्वाच्या घोषणा

  • डॉ. आंबेडकरांचे स्मारक 2020 च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करू
  • मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन, बसेस अशा सर्व दळवळणाच्या साधनांना सिंगल तिकिटावर आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करणार
  • वसई-भाईंदर खाडी पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे
  • ट्रान्स हार्बर लिंक 22 किमीचा समुद्री मार्ग वेगाने सुर आहे
  • विरार ते अलिबाग मल्टी-मॉडेल 123 किमी लांबीचा कॉरिडॉर तयार करतोय. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदर या कॉरिडॉरला जोडणार
  • नयना सिटीचा पहिला विकास आराखडा तयार झाला, तर दुसऱ्याला मान्यता देतोय
  • मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन, बसेस अशा सर्व दळवळणाच्या साधनांना सिंगल तिकिटावर आणण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एमएमआरडीएची नेमणूक करणार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget