एक्स्प्लोर
Advertisement
व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन
'स्वच्छतेची सुरुवात दिल्लीतून नाही, तर 17 वर्षांपूर्वी आर आर पाटील यांनी सुरु केली.'
मुंबई: ‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हावं: सुप्रिया सुळे
‘महाराष्ट्र पुरोगामी आहे पण आता त्याचं पुरोगामित्व अधोरेखित होण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वच खासदार नेहमीच ऐकी दाखवतात. महाराष्ट्र दिल्लीत आपला ठसा कायमच उमटवत आला आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
‘स्वच्छता मोहीमेची सुरुवात 17 वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांनी सुरु केली’
‘पंतप्रधान मोदींनी आता जरी स्वच्छेतेची मोहीम हाती घेतली असली तरी या मोहीमेची सुरुवात 17 वर्षांपूर्वीच आर. आर. पाटील यांनी केली होती.’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी स्वच्छता मोहीम राष्ट्रवादी काँग्रेसनच सुरु केल्याचं ठासून सांगितलं.
राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन
आई-वडील आणि सासू-सासरे सोडून मला कोणाचीही भीती नाही : सुप्रिया सुळे
महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हायल हवं : सुप्रिया सुळे
ठिबक सिंचन आणि पाण्याच्या उपलब्धतेवर काम गरजेचं : सुप्रिया सुळे
आत्महत्यामुक्त आणि कुपोषणमुक्त महाराष्ट्र व्हायला हवं : सुप्रिया सुळे
शिक्षण क्षेत्रात भरीव काम होणं गरजेचं : सुप्रिया सुळे
स्वच्छतेची सुरुवात दिल्लीतून नाही, तर 17 वर्षांपूर्वी आर आर पाटील यांनी सुरु केली : सुप्रिया सुळे
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion