एक्स्प्लोर

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले 155 कोटी

विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल 155 कोटी दंड म्हणून वसूल केले आहेत.

मुंबई : प्रवाशांकडून दंड म्हणून आकारण्यात आलेल्या रकमेचा नवीन विक्रम झाला आहे. एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत प्रवाशांकडून दंड म्हणून आकारण्यात आलेली रक्कम तब्बल 155 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यात अंदाजे 30 लाख प्रवासी तिकीट न काढता प्रवास करत असल्याने त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. परिणामी मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 155 कोटी रुपये कमावले आहेत. यात मुंबई उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. मध्य रेल्वेचे एकूण 5 विभाग आहेत. अश्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागात मिळून ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच काळात करण्यात आलेल्या कारवाईच्यापेक्षा 10% अधिक रक्कम यावेळी केलेल्या कारवाईत जमा झाली आहे. फक्त डिसेंबर 2019 या एका महिन्यात 12 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत प्रवाश्यांना आवाहन करुन तिकीट काढून प्रवास करण्यास सांगितले आहे. मात्र, रेल्वेने यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करुन तिकीट नसलेल्या प्रवाश्यांना दंड आकारायला हवा, तरच रेल्वेमधील अश्या प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. सोबत जे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात त्यांना जास्त सोयी सुविधांचा लाभ घेता येईल. फुकट्या प्रवाशांमध्ये वाढ - मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात मात्र, यापैकी अनेकजण तिकिट न काढताच प्रवास करत असतात. पश्‍चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेवर अशा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात सर्वाधिक फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर आहेत. रेल्वेतून प्रवास करताना योग्य तिकीट न घेता तसेच फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे. बऱ्याचदा प्रवासी गर्दीमुळे किंवा घाईत असल्या कारणाने विनातिकीट प्रवासाचे धाडस करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वेच्या डेटानुसार, देशभरात दररोज 75 हजार प्रवाशी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करतात. संबंधित बातमी - डोंबिवलीच्या लोकल गर्दीचा आणखी एक बळी, लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू Mumbai | पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे | ABP Majha

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Marathi : मराठी सक्तीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती? ऑगस्टपर्यंत सरकारने अंमलबजावणी थांबवल्याचा शशांक राव यांचा दावा
मराठी सक्तीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती? ऑगस्टपर्यंत सरकारने अंमलबजावणी थांबवल्याचा शशांक राव यांचा दावा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
वाढदिवसाच्या रीलसाठी धोकादायक स्टंट, भर रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा प्रकार, आरोपीला अटक 
वाढदिवसाच्या रीलसाठी धोकादायक स्टंट, भर रस्त्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा प्रकार, आरोपीला अटक 

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Embed widget