एक्स्प्लोर

BMC News : पवई तलाव सुशोभिकरण बांधकामाचे अवशेष 31 मेपर्यंत हटवून जागा पूर्ववत करा; हायकोर्टाचे महापालिकेला आदेश

BMC News :  पवई तलाव सुशोभिकरणाचा प्रकल्प हायकोर्टानं रद्द करूनही बांधकाम 'जैसे थे'च असल्याचे सांगत अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर हायकोर्टाने मुंबई महापालिकेला 31 मेपर्यंत जागा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.

BMC News :  बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून पवई तलावाच्या (Powai Lake) लगत उभारण्यात येणाऱ्या 'सायकल आणि जॉगिंग ट्रॅक'चं (Cycle and Jogging Track) बांधकाम हायकोर्टानं (Bombay High Court) आदेश देऊनही अद्यापही पाडण्यात आलेलं नाही. हे निदर्शनास आणून देत यासंदर्भात एक अवमान याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेऊन मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे बांधकाम पाडून ती जागा पूर्ववत करा, असे आदेश हायकोर्टानं गुरुवारी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा पवई तलावालगतचा सायकल आणि जॉगिंग ट्रॅक प्रकल्प मे 2022 मध्ये हायकोर्टानं बेकायदा ठरवला होता. या प्रकल्पाचं बांधकाम थांबवत, त्या ठिकाणी झालेलं बांधकाम त्वरीत तोडून ती जागा पूर्ववत करण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टानं दिले होते. या निर्णयाविरोधात पालिकेनं सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र कालांतरानं ती याचिका मागे घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाच्या आदेशाला कोणतीही स्थगिती दिलेली नव्हती. परंतु तरीही प्रकल्पाचं बांधकाम दिलेल्या आदेशांनुसार अद्याप तोडण्यात आलेलं नाही. त्याविरोधात 'वनशक्ती' या संस्थेनं वकील झमन अली यांच्यामार्फत ही अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरूवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर 10 जून 2022 रोजी संस्थेनं या अवमानप्रकरणी महानगरपालिकेला रितसर नोटीसही पाठवली होती. प्रकल्पाच्या बांधकामामुळे तलावाच्या सभोवतालचं वातावरण आणि जैव-व्यवस्थेवर थेट परिणाम होत आहे. या तलावात मगरींचा अधिवास असल्यानं मगरींनाही त्याचा त्रास होतोय, असा दावाही अवमान याचिकेतून करण्यात आला आहे.

हायकोर्टानं याची दखल घेत पालिकेकडे विचारणा केली असता, पालिका प्रशासनाचा न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे वकील जोएल कार्लोस यांनी स्पष्ट केलं. रस्ता अरुंद असल्यानं तोडकामाला उशीर होत आहे. तर दुसरीकडे, हे संरक्षित क्षेत्र असल्यानं पर्यावरणाला धोका पोहोचू नये यासाठी हे बांधकाम हळूहळू तोडण्यात येत असल्याचंही पालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आलं. तेव्हा, हे बांधकाम कधीपर्यंत तोडण्यात येईल? असा प्रश्न हायकोर्टानं विचारला. तेव्हा जून अखेरीपर्यंत ते पूर्णपणे पाडण्यात येईल, असं पालिकेतर्फे सांगण्यात आलं. यावर न्यायालयानं आश्चर्य व्यक्त करत जून महिन्यात पावसाळा सुरू होतो. त्यामुळे बांधकाम तोडण्यासाठी आणखी उशीर होऊ शकतो. त्यामुळे 31 मेपर्यंत हे तोडकाम पूर्ण करून ती जागा पूर्ववत करण्याची हमी महानगरपालिका आयुक्तांनी द्यावी, असं  स्पष्ट करत आयुक्तांना यावर हमीपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget