एक्स्प्लोर

'खेळ आता सुरु झालाय...'; जामीनानंतर अर्णब गोस्वामी यांचा सरकारला थेट इशारा

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना दिलासा दिला आहे.

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी गेल्या एका आठवड्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा न्यूज रुममध्ये दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी 'खोट्या' प्रकरणात त्यांना अटक केल्याचं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी हल्लाबोल केला. रिपब्लिक चॅनलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत असलेल्या गोस्वामी यांनी सांगितले की, 'उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय.'

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्याला झालेली अटक ही 'अवैध' असल्याचं सांगत अर्णब गोस्वामी यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली.

अर्णब गोस्वामी म्हणाले की, 'तळोजा कारागृहात त्यांची पोलिसांनी तीन टप्प्यांत चौकशी केली. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे तुम्ही मला एका जुन्या, खोट्या प्रकरणात अटक केली. आणि माझी माफीही मागितली नाही.' ते म्हणाले की, 'खेळ आता सुरु झाला आहे.' गोस्वामी म्हणाले की, 'ते प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरु करणार आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्येही त्यांची उपस्थिती आहे.'

पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवत अर्णब गोस्वामी म्हणाले की, 'मी कारागृहातूनही चॅनल सुरु करणार आणि तुम्ही (ठाकरे) काहीच करू शकणार नाही.' तसेच गोस्वामी यांनी अंतरिम जामीन दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत.

पाहा व्हिडीओ : अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विशेष सरकारी वकिलांची नाराजी

अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाचा दिलासा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अर्णब गोस्वामी यांना दिलासा नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाकडून चूक झाली असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली.

अर्णब गोस्वामी यांना तळोजात का हलवलं होतं?

अलिबाग कारागृहाच्या कैद्यांसाठीच्या विलगीकरणातून अर्णब गोस्वामी यांना रविवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आलं. गोस्वामी यांना ज्या नगर परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलं होतं तिथं कोठडीत ते मोबाईल वापरताना आढळून आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजात हलवण्याचा निर्णय जेल प्रशासनानं घेतला.

प्रकरण काय आहे ?

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गेल्या बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना थेट अलिबाग कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या निर्णयाला आव्हान देत ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गोस्वामींच्यावतीने हायकोर्टात अंतरीम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर विस्तृत सुनावणी घेत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'कोट्या'धीश, त्यांच्या कोट्या पुन्हा ऐकायला मिळोत; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
Eknath Shinde : उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले!
उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले!
मोठी बातमी! धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, याचिका फेटाळली
मोठी बातमी! धर्मांतर केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, याचिका फेटाळली
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2026 | मंगळवार
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
Embed widget