एक्स्प्लोर
Advertisement
घातक रसायनांचा वापर करून पिकवलेले 890 किलो आंबे जप्त!
उल्हासनगर: उन्हाळा सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरात फळांचा राजा आंबा आवर्जुन आणला जातो. मात्र, तुम्ही खात असलेला आंबा कसा पिकवला आहे याची खातरजमा करून घ्या. कारण घातक रसायनांपासून पिकवलेले तब्बल 890 किलो आंबे उल्हासनगरमध्ये जप्त करण्यात आले आहेत.
उल्हासनगर महापालिका आणि अन्न-औषध विभागानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील परिसरातून हे घातक आंबे जप्त करण्यात आले आहेत.
उल्हासनगर कॅम्प 1 भागातील आंब्याच्या दुकानावर धाड मारुन हे आंबे जप्त करण्यात आले. आंबे लवकर पिकावेत यासाठी विक्रेते सर्रासपणे घातक रसायनाचा वापर करतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी दक्ष राहावं असं आवाहन अन्न-औषध विभागानं केलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion