एक्स्प्लोर

26/11 Terror Attacks : विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला? 

26/11 Terror Attacks : मुंबई हल्लामुळे नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचा आणि आरआर पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

26/11 Terror Attacks : राजकारणात सर्वात मोठा शब्द म्हणजे राजीनामा...काहीही झालं तरी राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो हे फार नॉर्मल आहे. 2014 ते 2019 या काळात सत्तेत असलेले शिवसेनेचे सगळेच मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. पण असाच एक राजीनामा 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी दिला होता. 
 
मुंबईतील सामान्य माणसं रात्रीचं जेवण करून निवांत झोपायच्या तयारीत होती. सर्व काही नॉर्मल होतं. पण हॉल मधला टेलिव्हिजन सुरू झाला आणि सगळ्यांना धक्काच बसला. ती बातमी होती ताज हॉटेलमध्ये आणि CST रेल्वे स्टेशनवर झालेल्या गोळीबाराची. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तो दिवस होता 26 नोव्हेंबर 2008. आज त्या घटनेला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्या आठवणी मात्र आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यानंतर राज्यातील दोन बड्या नेत्यांना राजीनामे द्यावे लागले होते.

CST आणि ताज नंतर नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटलला पाकिस्तानातून  आलेल्या दहशतवाद्यांकडून टार्गेट करण्यात आलं होतं. हे संपूर्ण नाट्य तीन दिवस सुरू राहिलं आणि अखेर मुंबई पोलीस, NSG आणि MARCOS ने मिळून दहशतवाद्यांचा खात्मा केला. अनेक लोक यात मरण पावले, अनेक पोलीस अधिकारी आणि देशाचे जवान या चकमकीत शहीद सुद्धा झाले.
 
परंतु हे नाट्य संपलं आणि झाला एक मोठा राजकीय वाद. ज्या मुळे विलासराव देशमुख आणि आर आर पाटलांना राजीनामा द्यावा लागला. एखादी मोठी घडामोड झाली की त्यावर फिल्म बनवण्याचा मोह सर्वच फिल्ममकेर्सना असतो. असाच मोह कदाचित त्या वेळेस दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना सुद्धा झाला आणि ते थेट पोहोचले ताज हॉटेलमध्ये. त्यांच्या सोबत होते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे सुपुत्र रितेश देशमुख. 

राम गोपाल वर्मा यांचा ताज हॉटेलमध्ये 26/11 च्या हल्ल्यावर फिल्म बनवण्याचा विचार असल्यानं रेकी करायला गेल्याचा आरोप झाला. तर रितेशला फिल्ममध्ये कास्ट करणार असल्याच वृत्त आलं आणि राजकीय वणव्याने पेट घेतला. या नंतर ती भेट सहज होती असा देखील सूर राम गोपाल वर्मा यांनी दिला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

सर्वच स्तरांवरून विलासराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका झाली. फिल्म इंडस्ट्रिनेसुद्धा राम गोपाल वर्मा यांच्यावर हल्लाबोल केला. एकीकडे निष्पाप लोकांचे गेलेले प्राण आणि दुसरीकडे फिल्मचा घाट, यामुळे सामान्य जनतेचा हा आर्क्रोश सहज दिसून आला. यानंतर काहीच दिवसांनी सलग चार वर्ष मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा थेट राजीनामा द्यावा लागला. 

दुसरा राजीनामा...
या दरम्यान आर आर पाटलांनी पत्रकारांशी बोलताना शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातला एक डायलॉग मारला आणि राजीनाम्याला आमंत्रण  दिले. तो डायलॉग होता 'बडे बडे शहरो में, एसी छोटी छोटी बाते होती रहती है'. यावरुन गोंधळ सुरु झाला आणि अखेर आर आर पाटलांनासुद्धा गृहमंत्री पदाची खुर्ची रिकामी करावी लागली होती.

पण एकंदरीत या दोन्ही नेत्यांची कारकीर्द फार मोठी आहेत आणि महाराष्ट्र राज्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.आज हे दोन्ही नेते आपल्यात नाहीत. परंतु महाराष्ट्र या लोक नेत्यांना कधीच विसरणार नाही.

About the author संकेत वरक

संकेत वरक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले

व्हिडीओ

Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
Embed widget