एक्स्प्लोर

…तर 2019 नंतर निवडणुकाच होणार नाहीत!

“सत्ता येते आणि जाते. दुःख वाटायची गरज नाही. पण आता ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करायची गरज आहे. लोकांच्या मनात अदृश्य भीती आहे. प्रत्येक घटकांच्या मनात धास्ती आहे."

मुंबई : वाजपेयी शासन होतं, पण 2014 नंतरच्या कालावधीचा विचार केल्यास एवढी वाईट परिस्थिती देशात कधीच नव्हती. ही परिस्थिती राहिली आणि समविचारी पक्षांनी एकत्र आलो नाही, तर 2019 नंतर निवडणूक होतील का, अशी भीती मनात आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या मताला दुजोरा देणारा सूर, चर्चासत्रातील सहभागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनीही व्यक्त केला. लोकशाहीविरोधी मोदी सरकार गेलेच पाहिजे, अशी भूमिका घेत 'फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॅसी’नं एका फोरमची स्थापना केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक राजकीय फळी निर्माण करावी, यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात राज्यातले सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले? “वाजपेयी शासन होतं, पण 2014 नंतरच्या कालावधीचा विचार केला एवढी वाईट परिस्थिती देशात नव्हती. हीच परिस्थिती राहिली आणि आपण एकत्र आलो नाही, तर 2019 नंतर निवडणूक होतील का अशी भीती मनात आहे.”, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच, “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा पत्रकार परिषद घेतात. देशात असं कधीही घडलं नव्हतं.” असे म्हणत चव्हाण पुढे म्हणाले, “इतकं असून ते निवडणुका का जिंकतात? मनी पॉवर आणि मसल पॉवर. पैशाचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. सत्तेचा दुरुपयोग करतात. गपचूप बस, नाहीतर ट्रायल फेस करा, नाहीतर आमच्याकडे ये. पुढच्या सहा महिन्यात देशात उद्रेक राहिल्याशिवाय होणार नाही.” माध्यमांची साथ आवश्यक आहे. विरोधीपक्षाला स्पेस मिळत नाही. माध्यमांना सांगतो, दोन्ही बाजू आल्या पाहिजेत. आमची बाजूही लोकांपर्यंत आली पाहिजे, अशी आशाही चव्हाणांनी व्यक्त केली. जयंत पाटील काय म्हणाले? “सत्ता येते आणि जाते. दुःख वाटायची गरज नाही. पण आता ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करायची गरज आहे. लोकांच्या मनात अदृश्य भीती आहे. प्रत्येक घटकांच्या मनात धास्ती आहे. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यावर गेल्या चार वर्ष प्रभाव तयार केला गेला आहे.”, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, इथे बसलेल्या लोकांनी छोटे प्रश्न बाजूला ठेवून लोकशाहीसाठी एकत्र आले पाहिजे. निवडून आल्यावर भांडता येईल, असेही पाटील म्हणाले. “वाजपेयी सरकार पाहिलं, कितीही झालं तरी वाजपेयी यांनी लोकशाहीची चौकट मोडली नाही. आता जे सत्ताधारी आहेत, त्यांना एक पद्धतीने देश न्यायचं आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. कारण नंतर कदाचित निवडणूक होणार नाही.”, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राजू शेट्टी काय म्हणाले? एक शेतकरी चळवळ सोडली तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत, अशी खंत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रातल्या सहकार बुडाला, बँक अवस्था खराब झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र सगळ्यात आधी तिथून बाहेर आम्ही पडलो.”, असेही शेट्टी यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Maharashtra HSC 12th Result 2026: मोठी बातमी : बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या निकालाचा टक्का पुन्हा घसरला, पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल!
मोठी बातमी : बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या निकालाचा टक्का पुन्हा घसरला, पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल!
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?
बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी; नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल, लातूरचा निकाल सर्वात कमी, पाहा तुमच्या विभागाची टक्केवारी

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल, कोणत्या नंबरवर पाठवाल?
बारावीचा निकाल मोबाईलवर कसा पाहाल? काय SMS टाईप कराल? जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Embed widget