एक्स्प्लोर

…तर 2019 नंतर निवडणुकाच होणार नाहीत!

“सत्ता येते आणि जाते. दुःख वाटायची गरज नाही. पण आता ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करायची गरज आहे. लोकांच्या मनात अदृश्य भीती आहे. प्रत्येक घटकांच्या मनात धास्ती आहे."

मुंबई : वाजपेयी शासन होतं, पण 2014 नंतरच्या कालावधीचा विचार केल्यास एवढी वाईट परिस्थिती देशात कधीच नव्हती. ही परिस्थिती राहिली आणि समविचारी पक्षांनी एकत्र आलो नाही, तर 2019 नंतर निवडणूक होतील का, अशी भीती मनात आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या मताला दुजोरा देणारा सूर, चर्चासत्रातील सहभागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनीही व्यक्त केला. लोकशाहीविरोधी मोदी सरकार गेलेच पाहिजे, अशी भूमिका घेत 'फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॅसी’नं एका फोरमची स्थापना केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक राजकीय फळी निर्माण करावी, यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात राज्यातले सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले? “वाजपेयी शासन होतं, पण 2014 नंतरच्या कालावधीचा विचार केला एवढी वाईट परिस्थिती देशात नव्हती. हीच परिस्थिती राहिली आणि आपण एकत्र आलो नाही, तर 2019 नंतर निवडणूक होतील का अशी भीती मनात आहे.”, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच, “सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा पत्रकार परिषद घेतात. देशात असं कधीही घडलं नव्हतं.” असे म्हणत चव्हाण पुढे म्हणाले, “इतकं असून ते निवडणुका का जिंकतात? मनी पॉवर आणि मसल पॉवर. पैशाचा प्रचंड दुरुपयोग सुरु आहे. सत्तेचा दुरुपयोग करतात. गपचूप बस, नाहीतर ट्रायल फेस करा, नाहीतर आमच्याकडे ये. पुढच्या सहा महिन्यात देशात उद्रेक राहिल्याशिवाय होणार नाही.” माध्यमांची साथ आवश्यक आहे. विरोधीपक्षाला स्पेस मिळत नाही. माध्यमांना सांगतो, दोन्ही बाजू आल्या पाहिजेत. आमची बाजूही लोकांपर्यंत आली पाहिजे, अशी आशाही चव्हाणांनी व्यक्त केली. जयंत पाटील काय म्हणाले? “सत्ता येते आणि जाते. दुःख वाटायची गरज नाही. पण आता ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामुळे चिंता करायची गरज आहे. लोकांच्या मनात अदृश्य भीती आहे. प्रत्येक घटकांच्या मनात धास्ती आहे. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, निवडणूक घेण्याची व्यवस्था यावर गेल्या चार वर्ष प्रभाव तयार केला गेला आहे.”, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, इथे बसलेल्या लोकांनी छोटे प्रश्न बाजूला ठेवून लोकशाहीसाठी एकत्र आले पाहिजे. निवडून आल्यावर भांडता येईल, असेही पाटील म्हणाले. “वाजपेयी सरकार पाहिलं, कितीही झालं तरी वाजपेयी यांनी लोकशाहीची चौकट मोडली नाही. आता जे सत्ताधारी आहेत, त्यांना एक पद्धतीने देश न्यायचं आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. कारण नंतर कदाचित निवडणूक होणार नाही.”, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राजू शेट्टी काय म्हणाले? एक शेतकरी चळवळ सोडली तर इतर चळवळी शांत झाल्या आहेत, अशी खंत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रातल्या सहकार बुडाला, बँक अवस्था खराब झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा आपलासा वाटला म्हणून भोळी आशा घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो. मात्र सगळ्यात आधी तिथून बाहेर आम्ही पडलो.”, असेही शेट्टी यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime Case: तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, आरोपींनी दोन्ही भावांना संपवलं; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप
तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, आरोपींनी दोन्ही भावांना संपवलं; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता...'
प्रकरणावर गृहमंत्र्यांचा दबाव, नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती; प्रशांत आंबींचा थेट आरोप, म्हणाले, 'आम्ही आता...'
Maharashtra Live blog updates: आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शिवतीर्थ निवास्थनी जाऊन घेतली भेट
Maharashtra Live blog updates: आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; शिवतीर्थ निवास्थनी जाऊन घेतली भेट
NEET Exam Shivraj Motegaonkar: शिवराज मोटेगावकरांची भोंदूगिरी, बेंचवर चढून विद्यार्थ्यांवर पवित्र पाणी शिंपडतानाचा व्हिडीओ व्हायरल
शिवराज मोटेगावकरांची भोंदूगिरी, बेंचवर चढून विद्यार्थ्यांवर पवित्र पाणी शिंपडतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
Laxman Hake on OBC Reservation: 'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
'टमरेल', 'झाडूपोचा' करणारा प्रसाद लाड जरांगेंकडे जातो, त्याला आरक्षणातील काय कळतं? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Popular Singers Accident: कार्यक्रम आटोपून घरी जाताना तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
Embed widget