एक्स्प्लोर

एसटीचा प्रवास विना पास मग खासगी वाहनाला पास बंधनकारक का? खासगी वाहनांसाठी ई-पास रद्द करण्याची मागणी

राज्यात एसटीने प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही मग खाजगी वाहनांना हा पास अनिवार्य का आहे, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जातोय.

देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्याची एसटी सेवा देखील बंद होती. 18 मार्च पासून टप्याटप्याने एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. मध्यंतरी जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यात आली होती, मात्र पुरेसे प्रवासी उपलब्ध न झाल्याने बहुतांश फेऱ्या रद्द करण्याची वेळ महामंडळावर येत होती. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आजपासून ही वाहतूक अखेर सुरू झाली आहे, ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणात तर काही ठिकाणी मर्यादित प्रवासीसंख्या असताना देखील एसटी सुरू झालीय.
मात्र अशातच सोशल मीडियावर एक मेसेज सध्या चांगलाच वायरल होतोय, "अनोळखी लोकांसोबत एसटी बस मधून प्रवास करताना E pass लागणार नाही, पण तुम्ही तुमच्या गाडीत तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास करत असाल तर मात्र E pass ? ?"  हा मेसेज व्हॉट्सअॅपवर सध्या चांगलाच वायरल होतोय. एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाहीय. तर खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी देखील हा ई-पास रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.
राज्यातील सर्व सीमांवर सध्या नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी या नाक्यांवर केली जातेय. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील अशाच पद्धतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिंधीनी काही नागरिकांशी संवाद साधला असता एसटीला पास नाही आणि खासगी वाहनांना मात्र पास बंधनकारक असल्यावरुन काही जणांनी नाराजगी व्यक्त केली.
"एसटी महामंडाळाच्या गाडीतून प्रवास करणारे हे सुरक्षित आणि खासगी गाडीतून प्रवास करणारे असुरक्षित असं असू शकत नाही. कोरोना कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनाच पास बंधनकारक करावे अन्यथा कोणालाच पासची सक्ती करु नये" म्हणत अनेक प्रवाशांनी सरकारच्या या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त केली. ई पास बाबत घेतलेला निर्णय हा विरोधाभासी असल्याचं मत प्रवाशांनी व्यक्त केलं.
ई-पास काढण्यासाठी नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. राज्यात सर्व काही पूर्वपदावर येत असल्याने अशा पद्धतीने पासची सक्ती करण्यात येऊ नये अशी प्रवाशांची भावना आहे. दरम्यान ई-पास बंधनकारक केल्यामुळे काही जण याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही ठिकाणी बोगस पास बनवणारी टोळी कार्यरत आहे. ज्यांना वेळेवर पास मिळत नाही अशा प्रवाशांना ही टोळी बोगस पास मिळवण्यात मदत करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख जमीर यांनी केला आहे. राज्यभरातून या प्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या आणि अनेकांना या कृत्यामुळे अटकही झाली.
दरम्यान नाकाबंदीवेळी कित्येक प्रवासी अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करत असतात. मात्र अशावेळी त्यांच्याकडे पास असेलच अशी परिस्थिती नसते. त्यावेळी त्यांना पास नसल्यास देखील प्रवेश द्यावा लागतो. तर काही वेळेस पास नसणारे काही लोक सुसाट गाडी चालवत, नाकाबंदीला लावण्यात आलेले बॅरिकेडसुद्धा तोडून पळून जातात. रात्रीच्यावेळी नाकाबंदी करत असताना अशा लोकांमुळे इतर प्रवाशांना धोका निर्माण होत असल्याची भावना नाकाबंदीवर ड्युटी करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली.  त्यामुळे ई-पास केवळ सोपस्कार म्हणून किंवा कर्मकांडापुरतेच मर्यादित राहिल्याची स्थिती दिसून येत आहे.
संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget