एक्स्प्लोर

Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड

बीड लोकसभा निवडणुकीत जाती-पातीचं राजकारण झाल्याचं शिक्कामोर्तब झालाय. कारण याच राजकारणाचे पडसाद आता स्थानिक गावकऱ्यांमध्ये उमटू लागल्याचं दिसून येते आहे.

बीड : लोकसभा निवडणुकांतील प्रचारादरम्यान बीडमध्ये जातीय रंग पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलाही सहभाग न घेता, ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा असे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्यामुळे, जरांगेंनी थेट भूमिका न घेता लोकसभा निवडणुकीत फारकत घेतली. मात्र, बीड हे मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा असल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र बनले होते. त्यातच, बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या लढतीवेळी काही प्रमाणात मराठा-वंजारी वाद स्थानिक पातळीवर दिसून आला. तर, निवडणुकांनंतरही तो जातीय वाद पुन्हा उफाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, मराठा-वंजारी समाजात एकमेकांच्या दुकानातून खरेदी केल्यास दंड आकारण्यात येईल, असे सांगणारे काही व्हिडिओ समाजमाध्यमांतून समोर आले आहे. त्यानंतर, आता बीडचे पोलीस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले आहेत. 

बीड लोकसभा निवडणुकीत जाती-पातीचं राजकारण झाल्याचं शिक्कामोर्तब झालाय. कारण याच राजकारणाचे पडसाद आता स्थानिक गावकऱ्यांमध्ये उमटू लागल्याचं दिसून येते आहे. दोन गावांतील वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी थेट मराठा समाजाच्या व्यक्तींकडून काही खरेदी करू नये, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येतंय. अचानक हे गावकरी संतप्त का झाले? कोणती शक्ती यामागे आहे? नेमकं कोण विष कालवत आहे? या अुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगत आहेत. त्यासंदर्भात आात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे पाटील यांनी बाजू मांडली आहे. 

पोलीस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले

लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत. त्यातच मुंडेवाडी गावात वंजारी समाजातील नागरिकांनी मराठा समाजाच्या व्यक्तीकडून खरेदी करू नये, असा निर्णय घेतल्याची बातमी एबीपी माझाने समोर आणल्यानंतर बीडचे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.  बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मुंडेवाडीत पोहोचले असून याबाबत अधिक तपास करत आहेत.

सुधीर मुनगंटीवार, देसाईंना सवाल

बीड मधील जातिवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही, आता मंत्री सुधीर मनगुंटीवार आणि शंभूराज देसाई यांनी याचे उत्तर द्यायला हवं. कारण, त्यांचं म्हणणं होतं की बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण होत आहे, किंवा त्यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याबाबत संवाद झाला पाहिजे, असे मुनगंटीवार आणि शंभूराज देसाई यांचं म्हणणं होतं. कोणी जातीवाद केला आणि कधी जातीवाद केला? आता कोण जातिवाद करतोय हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही, ते करणार नाहीत आणि मी होऊ बी देणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. 

मी जातीवाद होऊ देणार नाही - जरांगे

बीड जिल्ह्यातील सर्व मराठ्यांना माझं आवाहन आहे, शांततेत राहा, आता वेळ निघून गेलीय. यापूर्वी देखील मराठा शांत राहिला आहे. लोकसभा होऊन गेली आता विधानसभेला बघू. अगोदर कोणाचं नाव घेतलं नाही, त्यावेळेला नाव घेऊ, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.  वंजारी आणि मराठा समाजाचे कधी कुणाचे बांध कापलेत? तुम्हाला मतदान केलं तर चांगलं नाही केलं तर वाईट ही कसली लोकशाही?. मी कधी ओबीसी मराठा जातीवादी केला. मात्र, ग्राउंड लेव्हलवर कोण्या ओबीसीसोबत मी जातिवाद केला हे दाखवा. सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले होते, धनुभाऊ आणि पंकजा मुंडे कधीही जातिवाद करत नाहीत आता हे काय आहे? असा सवालही जरांगेंनी विचारला आहे.  त्या बहिण भावांना मी कधीच विरोधक मानलं नव्हतं, त्यांनी विनाकारण मला हिणवलं. मी बीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही. आम्ही जातीवाद करत नाही आणि हो देखील देणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले

मराठा समाजाने शांत राहावे

बीड जिल्हा संतांची भूमी आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही,आम्ही कधीच म्हणणार नाही ओबीसीच्या दुकानावर वंजारी समाजाच्या दुकानावर जाणार नाही. एवढे खालच्या दर्जाची विचार आम्ही ठेवणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. जिथे जिथे ओबीसी उमेदवारांसाठी मराठा आमदारांनी काम केले, यासाठीच का, आमच्या अंगावर घालण्यासाठी ओबीसीच्या उमेदवारांचे काम केले का ? असा प्रश्न (जाब) मराठा समाज त्यांना विचारणार आहे. मात्र, मराठा समाजाला विनंती आहे, सर्वांनी शांत राहा, त्यात काही मजा नाही, थोडी हवा असते, असेही पाटील यांनी म्हटले. 

सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे - सोनवणे

मुंडेवाडी हे गाव चांगलं आहे, तेथील लोक जातीवादावर काम करणारे नाहीत. केवळ वंजाराच नाही, तर दलित, बौद्ध समाजही गावात आहे. माझ्या केज तालुक्यातील ते गाव असल्याने मला चांगलं माहिती आहे. यापूर्वीही त्या गावाने वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केलंय. मात्र, या गावाने अशा पद्धतीने टोकाचं आवाहन करणं हे चुकीचं आहे. माझं गावातील सर्वांनाच आवाहन आहे की,  आपल्या संस्कृतीला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. बहुजन समाजात सर्वचजण आले, सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, असे बजरंग सोनवणेंनी म्हटले. या घटनांमागे जे कोणी असतील, त्यामागे प्रशासनाने डोळसपणे तपास केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. प्रशासन कुठं आहे, कलेक्टर, एसपी काय करतात?, असा सवालही सोनवणेंनी उपस्थित केला. तसेच, अशा गोष्टीत मी राजकीय कुणाला दोष देणार नाही, कुणाचं नाव घेण्याची माझी संस्कृती नाही. माझा सवाल प्रशासनाला आहे, असेही बजरंग सोनवणेंनी म्हटले. 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget