एक्स्प्लोर

सरकारं बदलली तर विकासकामांचं काय होतं?

ज्यावेळी सरकार बदलतं त्याचा थेट परिणाम हा, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर होतो. बऱ्याचवेळा आधीच्या सरकारचा प्रभाव कमी करण्यासाठी हे प्रकल्प रखडवले जातात किंवा त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होतो.

मुंबई - राज्यात सध्या नवीन सरकार येण्याची चिन्हं दिसत आहेत. ज्यावेळी सरकार बदलतं त्याचा थेट परिणाम हा, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर होतो. आधीच्या सरकारचं क्रेडीट कमी करण्यासाठी अनेकवेळा असे प्रकल्प प्रलंबित ठेवले जातात किंवा त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी अनेक विकास प्रकल्प रखडले जातात. फडणवीस सरकारच्या काळातही असे अनेक महत्वाचे प्रकल्प सध्या सुरु आहेत. त्यामुळं या प्रकल्पांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न. मेट्रो 3 या प्रकल्पाचं काय होणार? मेट्रो 3 या प्रकल्पासाठी साधारण 24 हजार कोटींचा खर्च आहे. यावर खर्च होणारा निधी केंद्र सरकार 10 टक्के, राज्य सरकार 10 टक्के असा विभागला आहे. त्यासोबत JICA या जपानी कंपनीचे 57 टक्के म्हणजेच साधारण 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. यासाठी एमएमआरसी(मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन)ही स्वतंत्र कंपनी स्थानप करण्यात आली आहे. यावर मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर अश्विनी भिडे कार्यरत आहेत. या प्रकल्पाचे टेंडर अवॉर्ड होऊन काम जवळ जवळ 50 टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळे निधीच्या कमतरतेमुळे या प्रकल्पावर परिणाम होणार नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली तर त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांमुळे प्रकल्पाची डेडलाईन गाठण्यास विलंब होऊ शकतो. तसेच संबंधित अधिकारी बदलल्यास कामच्या गतीवर परिणाम होऊ शकतो समृद्धी महामार्ग होणार का? सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. नागपूर-मुंबईला जोडणारा हा 710 किमीचा महामार्ग मुंबईला विदर्भाशी जोडेल. यास सर्वपक्षीय विरोध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी याला विरोध केला. या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी काम सुरु केले. समुद्धी महामार्गाचे काम ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावे तसेच या प्रकल्पासाठी काढलेल्या कर्जावरील व्याज प्रकल्पाच्या विलंबामुळे वाढू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दर महिन्याला या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मंत्रिमंडळाला सादर करणार आहे. मात्र, आता मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्यामुळे याचा थेट परिणाम कामाचा वेग आणि खर्चावर होण्याची शक्यता आहे. 2020 पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा होता. यासाठी 16 पॅकेजेस अवॉर्ड करण्यात आले असून साधारण 90 टक्के जमीनीचं भूसंपादन पूर्ण झाल्याचा शासनाचा दावा आहे. या प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा शेतकऱ्यांचा विरोध आणि भूसंपादन होतं. मात्र, भूसंपादनाचे क्लिष्ट काम मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांना मुदत वाढ देण्यात आली. त्यामुळे आता प्रमुख अडथळा दूर झाल्यामुळे अधिकारी बदलल्यास कामाच्या गतीवर फारसा परिणाम होईल, असं चित्र नाही. ‪

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget