एक्स्प्लोर
जायकवाडीतून बीड, परभणी, जालन्याला पाणी सोडणार

औरंगाबाद : बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडीतून तीन जिल्ह्यांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या 67 टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीतून 2 आणि 3 तारखेला पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणासाठी 4 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे तर परळी थर्मलसाठी 4 रोटेशनमध्ये 68 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येईल. गोदावरी नदीवरील 10 बॅरिकेटमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
























