एक्स्प्लोर
जायकवाडीतून बीड, परभणी, जालन्याला पाणी सोडणार

औरंगाबाद : बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडीतून तीन जिल्ह्यांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या 67 टक्के पाणीसाठा आहे.
जायकवाडीतून 2 आणि 3 तारखेला पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणासाठी 4 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे तर परळी थर्मलसाठी 4 रोटेशनमध्ये 68 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येईल.
गोदावरी नदीवरील 10 बॅरिकेटमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
