एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान
ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
मुंबई : विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 25 सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
- पालघर- 8
- नाशिक- 22
- नंदुरबार- 1
- अहमदनगर- 8
- पुणे- 1
- औरंगाबाद- 4
- नांदेड- 4
- उस्मानाबाद- 1
- जालना- 40
- हिंगोली- 13
- यवतमाळ- 7
- चंद्रपूर- 4
- गडचिरोली- 1
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion