एक्स्प्लोर

'उजनी'चं पाणी धोकादायक, प्यायल्याने कॅन्सरची शक्यता!

सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह 400 हून अधिक गावांना या धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी माणसं आणि जनावरांनाही पिण्यायोग्य नाही, असा निष्कर्ष निघाल्याने खळबळ उडाली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उजनी धरणातील पाण्याचा सोलापूर विद्यापीठानं शास्त्रशुध्द अभ्यास केला असून या चाचणीत पारा, शिस आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत. यामुळे उजनी धरणातील पाणी सतत पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे. यामुळे चार जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. उजनी धरणातून सोलापूरसह, उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो. सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि उस्मानाबाद या शहरांसह 400 हून अधिक गावांना या धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी माणसं आणि जनावरांनाही पिण्यायोग्य नाही, असा निष्कर्ष निघाल्याने खळबळ उडाली आहे. कसा केला अभ्यास? सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी उजनी धरणातील पाण्याचे आठ नमूने संकलित केले. एका टीमनं पाण्याचं रासायनिक पृथकरण केले. पाण्यात डिझाल ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन, केमिकल ऑक्सिजन डिमांड, नायट्रेट आणि सल्फेट आढळून आले, असल्याचे संशोधकांनी सांगितलं आहे. भीमा नदीच्या खोऱ्यावर उजनी धरणाची जोपासना होते. पुणे, भिगवण, इंदापूर इथल्या औद्योगिक वसाहतीतून दूषित पाणी धरणात येऊन मिळते. आजूबाजूच्या शेतीला दिलेली खतं, कीटकनाशकं मिश्रित पाणी धरणात येऊन धरणातील दूषित होते. सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक रासायनिक घटक अडवून आले आहेत, असे प्रकल्प संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी सांगितले आहे. उजनी'चं पाणी धोकादायक, प्यायल्याने कॅन्सरची शक्यता! शुद्धीकरण प्रकल्पात पाणी स्वच्छ करण्याची क्षमता नाही ! धरणाच्या पाण्याचा आजवर झालेला हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. उजनी धरणाचं पाणी दूषित आहे, याची चर्चा होतीच. मात्र आता त्यावर सोलापूर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहर आणि या गावांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात उजनीचं हे दूषित पाणी स्वच्छ करण्याची क्षमता नाही. त्यामुळे कॉलरा, मलेरिया आणि पचन क्षमता कमी होण्याचे रोग होऊ शकतात. तसेच कॅन्सरचाही धोका असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. क्षमतेच्या बाबतीत कोयना, जायकवाडीपेक्षाही मोठे धरण पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवरचे हे एक मोठे धरण आहे. याचे पाणी पुढे नीरा-नृसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव धरण उजनीला 'यशवंतसागर' असेही संबोधले जाते. उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे.  क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळा-मुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावाUday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहितीRaj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्राडीमंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Embed widget