एक्स्प्लोर

आर्थिक गर्तेत असलेल्या एसटीला 'या' कारणामुळे लॉकडाऊनच्या काळात कोटींचा नफा!

एसटीच्या माध्यमातून साखर, काजू, सिमेंट, पाईप्स, खते, चिरा, वाळू, किराणा, रोपे इत्यादींची वाहतूक केली जात आहे. अगदी सांगलीवरून साखर आणली तर सांगलीला परत जाताना रत्नागिरीतून खते पाठवली जातात.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात सर्वांची लाडकी एसटी. गावच्या वाहतूक विभागाचा कणा असलेला एसटी विभाग सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे अशा कारणांमुळे एसटी कायम चर्चेत राहते. सध्या एसटीनं स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देखील दिला आहे. खर्च आणि उत्पन्न यांचं गणित, यांचा मेळ बसत नसल्याचं एसटीची आर्थिक बाजू कमजोर होत आहे. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी तर अनेक प्रयत्न केले जात आहेत. नवीन योजना राबवल्या जात आहेत. पण, त्याला म्हणावं तसं यश अद्याप तरी मिळाल्याचं दिसून येत नाही. त्यात लॉकडाऊन लागला आणि एसटीच्या समस्या आणखी वाढल्या. सारे व्यवहार ठप्प झाल्यानं एसटीचा तोटा वाढू लागला. याच काळात सकारात्नक विचार करत एसटीनं मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला परवानगी मिळाल्यानंतर यातून एसटीला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. रत्नागिरी एसटी विभागाला 21 मेपासून 1 कोटी 9 लाख 52 हजार 854 रूपयांचं उत्पन्न अवघ्या 8 महिन्यात मिळालं आहे. केवळ रत्नागिरी एसटी विभागातील 50 मालवाहतूक गाड्या या राज्यभर मालाची ने-आण करत आहेत. त्यामुळे उत्पन्नाचं हक्काचा असा नवा पर्याय एसटीला उपलब्ध झाला आहे.

कोणत्या मालांची झाली वाहतूक?

21 मेपासून एसटीनं मालची ने-आण करण्यास सुरूवात केली. यामध्ये सुरूवातीला कोकणातील हापूस आंब्यानं सुरूवात झाली. त्यानंतर इतर मालांची ने-आण करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी, पुरवठादारांशी एसटी विभागानं संपर्क साधला. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. सध्याचा विचार करता एसटीच्या माध्यमातून साखर, काजू, सिमेंट, पाईप्स, खते, चिरा, वाळू, किराणा, रोपे इत्यादींची वाहतूक केली जात आहे. अगदी सांगलीवरून साखर आणली तर सांगलीला परत जाताना रत्नागिरीतून खते पाठवली जातात. 21 मेपासून डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी एसटी विभागातील 50 गाड्यांनी 2 लाख 96 हजार 944 किमी एक प्रवास केला असून त्यातून 1 कोटी 9 लाख 52 हजार 854 रूपयांचं उत्पन्न मिळाले, अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे विभाग नियंत्रण सुनिल भोकरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. दरम्यान, यापुढील काळात, कायमस्वरूपी एसटीच्या माध्यमातून मालवाहतूक सुरू राहणार असल्याची पुष्टी देखील भोकरे यांनी केली आहे.

...अन् गाडीचं झालं रूपांतर

सुरूवातीला मालवाहतुकीकरता पाच प्रवासी गाड्यांचं रूपांतर हे मालवाहतूक गाड्यांमध्ये करण्यात आलं. त्यानंतर प्रसिसाद वाढलेला पाहून 50 गाड्यांच्या माध्यमातून सध्या राज्यभरात मालाची ने - आणि केली आहे. मालवाहतुकीचा हा प्रयोग यशस्वी झाला असून एसटीला आता उत्पन्नाचा शाश्वत असा मार्ग सापडला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी,  विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीकाSanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Embed widget