एक्स्प्लोर

सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरुच, अवघ्या पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात तीन हजारांची घसरण

मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते. या कारणामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

लातूर : लातूरच्या बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचा दर हा 5700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल तीन हजार रुपयाची घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पदरी या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. या कारणामुळेच सोयाबीनचा हंगाम असूनसुद्धा आवकीवर परिणाम झाला आहे. 

मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते. या कारणामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनकडे वळला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारे पिके म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात आहे. देशात सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेणारं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला उत्तम पावसानं साथ दिली आणि त्याच पद्धतीनं सोयाबीनचा दरही दहा हजाराच्या आसपास पोचला होता. यासर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. 

आवक सुरु, भाव पडले 

ज्या शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीन पेरणी केली आहे. त्यांची काढणी आता सुरु आहे. मृग नक्षत्रात जिल्ह्यामध्ये पावसाने चांगली साथ दिली होती. त्या जोरावर अनेक शेतकर्‍यांनी पेरणी केली होती मात्र जुलै महिन्याच्या शेवटी ला पावसाने मोठा खंड दिला होता. शेतकरी चिंतेत होता ऑगस्ट महिन्यात पावसाने साथ देत सोयाबीनच्या पिकाला जीवदान दिलं होतं आणि याच काळात हळूहळू सोयाबीनचे भाव वाढतांना दिसत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाग मोलाची औषध खरेदी करून फवारणी करून पीक जगवले होतं. अशा शेतकऱ्यांच्या आता राशी सुरु आहेत. शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत आहेत. आवक सुरु असतानाच भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले त्यावेळेस जवळपास आठ हजार 600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. मात्र हळूहळू हा दर घसरत 5700 पर्यंत आला आहे. दराची ही घसरण अवघ्या पाच दिवसांत झाली आहे. 

काढणीचा खर्च ही वाढला होता. गतवर्षी सोयाबीन काढनीचा खर्च हा एकरी 2200 पासून 2500 पर्यंत येत होता. यावर्षी हा खर्च 3500 ते 4000 पर्यंत येत आहे. शेतकरी वर्गानं हा वाढवून येणाऱ्या खर्चसाठी ही तजवीज केली मात्र बाजारात मालाचे भाव पडले आहेत. 

बाजारात आता आवक सुरु झाली आहे. त्याचवेळी भाव पडतायत. काही दिवसानंतर आवक वाढनार आहे. त्यावेळी काय दर राहतील अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आवक कमी होण्यावर झाला आहे. 

उडरगाव येथील बालाजी मोहिते यानी एकरी 15 ते 20 हजार खर्च करत सोयाबीनचे पिक घेतले "30 कट्टे माल झाला आहे. आताच काट झाला आहे. कालचा भाव आज नाही मिळत म्हणाले. बाजार असा पडत असेल तर आम्ही काय करावे. असा प्रश्न मोहिते यांना पडला आहे. 

भाव असा पडत असल्यामुळं आवक कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी राशी केल्या आहेत. ते घाईत माल घेवून बाजारात येत आहेत. यामुळे भावावर परिणाम होत आहे. काही दिवासांत हे भाव स्थिर होतील. गरज असेल तर माल बाजारात आनावा अन्यथा थांबावे असे मत व्यापारी बालाप्रसाद बिदादा यांनी व्यक्त केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karuna Sharma on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावाSanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karuna Sharma on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Embed widget