एक्स्प्लोर

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिकांचा विचार गरजेचा : सुभाष देसाई

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असं वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे.

मुंबई : भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असं वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात देसाईंनी हे मोठं विधान केलंय. भाजपनं शिवसेनेला खोटं पाडण्याचा प्रतत्न केला नसता तर राज्यात चित्र वेगळं दिसलं असतं, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी नाणार प्रकल्पाविषयीदेखील भाष्य केलं आहे. नाणार प्रकल्पामुळे विकास होईल, तसेच रोजगारही उपलब्ध होईल, तरी तुमचा या प्रकल्पाला विरोध का? या प्रश्नाला उत्तरं देताना सुभाष देसाई म्हणाले की, 'कोणताही उद्योग, रोजगार, प्रकल्प आणायचा असेल तर त्यावेळी स्थानिकांच्या भावनांचा विचार करायचा की नाही? आमचं म्हणजेच, शिवसेनेचं ठाम मत आहे की, स्थानिकांना हवं असेल तर त्याचं स्वागत करावं, स्थानिकांना नको असेल तर त्यांच्या ते माथी मारायचं नाही.'

समृद्धी महामार्ग पालघर, शहापूर येथून जाणार आहे, तेथील स्थानिक प्रचंड नाराज आहेत, एवढचं नाहीतर स्थानिकांनी विरोधही दर्शवला आहे. मग स्थानिकांचा विचार काही विशिष्ट प्रकल्पांमध्ये करायचा आणि काही प्रकल्पांमध्ये नाही, असं काही आहे का? यावर उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले की, 'असं अजिबातच नाही, समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई अशा जवळपास 800 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील काही भागांतील लोकांचा विरोध होता. त्यांची समजूत काढल्यानंतर, त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यांना जी भिती वाटत होती, ती भिती दूर केल्यावर तसेच त्यांच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होत आहेत, हे दिसल्यावर त्यांचा विरोध मावळला. आता समृद्धी महामार्गाचं काम धुमधडाक्यात सुरू आहे. एवढचं नाहीतर त्या महामार्गाच्या आजूबाजूला काही उद्योगिक क्षेत्र निर्माण करून रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. त्यामुळे आता तेथील स्थानिकांचा विरोध नाही.'

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम एबीपी माझावर पाहू शकणार आहात.

संबंधित बातम्या : 

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन LIVE : शहराच्या गरजेप्रमाणे बदल होणं आवश्यक : जितेंद्र आव्हाड

‘जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’, वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | माझ्या हातात सरकारचा रिमोट नाही : शरद पवार

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालणार, शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget