एक्स्प्लोर

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिकांचा विचार गरजेचा : सुभाष देसाई

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असं वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे.

मुंबई : भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असं वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात देसाईंनी हे मोठं विधान केलंय. भाजपनं शिवसेनेला खोटं पाडण्याचा प्रतत्न केला नसता तर राज्यात चित्र वेगळं दिसलं असतं, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी नाणार प्रकल्पाविषयीदेखील भाष्य केलं आहे. नाणार प्रकल्पामुळे विकास होईल, तसेच रोजगारही उपलब्ध होईल, तरी तुमचा या प्रकल्पाला विरोध का? या प्रश्नाला उत्तरं देताना सुभाष देसाई म्हणाले की, 'कोणताही उद्योग, रोजगार, प्रकल्प आणायचा असेल तर त्यावेळी स्थानिकांच्या भावनांचा विचार करायचा की नाही? आमचं म्हणजेच, शिवसेनेचं ठाम मत आहे की, स्थानिकांना हवं असेल तर त्याचं स्वागत करावं, स्थानिकांना नको असेल तर त्यांच्या ते माथी मारायचं नाही.'

समृद्धी महामार्ग पालघर, शहापूर येथून जाणार आहे, तेथील स्थानिक प्रचंड नाराज आहेत, एवढचं नाहीतर स्थानिकांनी विरोधही दर्शवला आहे. मग स्थानिकांचा विचार काही विशिष्ट प्रकल्पांमध्ये करायचा आणि काही प्रकल्पांमध्ये नाही, असं काही आहे का? यावर उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले की, 'असं अजिबातच नाही, समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई अशा जवळपास 800 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील काही भागांतील लोकांचा विरोध होता. त्यांची समजूत काढल्यानंतर, त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यांना जी भिती वाटत होती, ती भिती दूर केल्यावर तसेच त्यांच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होत आहेत, हे दिसल्यावर त्यांचा विरोध मावळला. आता समृद्धी महामार्गाचं काम धुमधडाक्यात सुरू आहे. एवढचं नाहीतर त्या महामार्गाच्या आजूबाजूला काही उद्योगिक क्षेत्र निर्माण करून रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. त्यामुळे आता तेथील स्थानिकांचा विरोध नाही.'

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम एबीपी माझावर पाहू शकणार आहात.

संबंधित बातम्या : 

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन LIVE : शहराच्या गरजेप्रमाणे बदल होणं आवश्यक : जितेंद्र आव्हाड

‘जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’, वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | माझ्या हातात सरकारचा रिमोट नाही : शरद पवार

#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालणार, शरद पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Pune Crime : कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?
कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?
Agniveer Scheme: अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास ना निवृत्तीवेतन ना मरणोत्तर लाभ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास ना निवृत्तीवेतन ना मरणोत्तर लाभ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता...'
पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता...'

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Embed widget