एक्स्प्लोर

Sanjay Raut : देशात हिंदू नेत्यांचं राज्य असतानाही आक्रोश मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल  

Sanjay Raut : मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. परंतु, देशात हिंदू नेत्यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय.

मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन शक्तीमान हिंदू नेत्यांचं देशात राज्य आहे. महाराष्ट्रात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरी देखील राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. या देशात शक्तीमान हिंदू नेत्यांचं राज्य असताना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित न्याय मागण्यासाठी आक्रोश करत आहेत. ज्या मुलायमसिंह यादव यांनी राम सेवकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळं या आक्रोश मोर्चाचं स्वागत करायला पाहिजे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटंलं आहे.  

मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी यावेळी शिवसेना भवनसमोर घोषणाबाजी केली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यानी देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं हे दुर्देवाचं आहे. हिंदूंचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका केली.  

या देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे असे मोर्चे काढावे लागत आहेत. हे हिंदूंचं दुर्देव आहे. आठ वर्षांपासून हिंदू समाजाचा आक्रोश सुरू झालाय. मग हिंदूंना कुठं न्याय मिळाला. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित रस्त्यावर बसून न्याय मागतोय. ज्या मुलायमसिंह यादव यांनी रामसवेकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा नरेंद्र मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. त्यामुळे या विरोधात आजचा आक्रोश मोर्चा आहे. असे आक्रोश मोर्चे निघाले पाहिजेत. कारण हिंदू समाजाचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळं हा मोर्चा निगाला असेल तर चांगली गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.  

आजच्या मोर्चातील लोकांना शिवसेना भवनसमोर येऊन आक्रोश करावा लागला कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो हिंदूंचा आवाज ऐकतो, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.  

पाहा काय म्हणाले संजय राऊत? 

महत्वाच्या बातम्या

Hindu Jan Aakrosh Morcha : मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात, लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget