एक्स्प्लोर

RSS Chief Mohan Bhagwat: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी बांगलादेश मधील हिंदू बांधवांबद्दल सरसंघचालक यांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले 'हिंदू बांधवांना त्रास...'

RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh: बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, असं डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh: भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात (महाल परिसरातील मुख्यालय) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी बोलताना आपल्या शेजारील बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेवर देखील भाष्य केलं आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, असं डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. (RSS Chief Mohan Bhagwat on Bangladesh)

देशासाठी चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. पण फक्त चिंतन करून चालणार नाही. 1857 पासूनच्या संघर्ष चालला, त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळविले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नायकांची मोठी संख्या आहे. त्यात अहिंसक आंदोलनापासून क्रांतिकारक यांचा समावेश आहे. मात्र, हेच नायक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. तर सामान्य नागरिक ही तेव्हा देशासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाने वाटा उचलला. देशासाठी बलिदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज या कारणामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली, मात्र आजच्या पिढीवर स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

आपल्या स्वातंत्र्य देशासाठी आम्ही जे मार्ग निवडले आहे, त्यावर चालणे आवश्यक आहे, त्यासाठी घटनात्मक नियमांचे पालन करणे गरजेचं असल्याचंही डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी यावेळी सांगितलं आहे. 

बांगलादेशमधील परिस्थितीवरती केलं भाष्य

शेजारील देशात (बांगलादेश) उत्पात होत आहे. तेथील हिंदू बांधवांना त्याचा त्रास होत आहे. भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही, संकटात असलेल्यांना कायमच मदत केली. तो देश आपल्याशी कसं वागला हे भारताने पाहिले नाही, गरजेच्या काळात भारताने कायमच मदत केली.अराजकता असलेल्या देशांमध्ये असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार मदत करेलच, मात्र, त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, अंसही त्यांंनी यावेळी म्हटलं आहे.

देशात योग्य वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.. त्यासाठी आपण (समाजाने) आपल्या जीवनातील छोट्या छोट्या समस्यांचे उपाय शोधले पाहिजे, असंही यावेळी डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. देशात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. यानिमित्त राज्यात देखील ध्वजारोहण केले जात आहे. नागपुरातील संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी संबोधित केलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget