एक्स्प्लोर

कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद, धावपटू कविता राऊतची उपस्थिती, पाच हजार स्पर्धकांचा सहभाग

konkan Marathon : कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. पाच हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता.

पालघर : पालघर मधील झडपोली येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेमार्फत कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. पाच हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार श्रीनिवास वनगा यांनी पारितोषिक वितरणाला उपस्थिती लावली.  

शहरी खेळाडूंप्रमाणेच ग्रामीण भागातील स्पर्धकांनाही वाव मिळावा म्हणून मागील सात वर्षांपासून जिजाऊ संस्थेकडून वर्षां मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येतं. 

पालघर मधील झाडपोली येथे आज सातव्या वर्षी कोकण वर्षा मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. जवळपास पाच हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांचं सादरीकरण करण्यात आलं. या मॅरेथॉनचं प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केलं असून या स्पर्धामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळत असल्याचही पाहुण्यांकडून सांगण्यात आलं. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. 

श्रीकांत शिंदे म्हणाले, "त्यांना आता काही बोलण्यासारखं उरलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे काही विशेष नाही. सतत तेच तेच बोलतात.  त्यामुळे माध्यमे देखील त्यांना आता बाजूला करत चालली आहेत. अडीच वर्षात त्यांनी काय केलं याचा लेखाजोखा जनतेकडे आहे. त्यामुळे त्यांनी आता टीकाटिप्पणी बंद केली पाहिजे."

दहीहंडीला जसा खेळाचा दर्जा दिला तसेच काही निर्णय खेळाडूंच्या बाबतीत घेतले जातील आणि त्यासाठी  इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न केले जातील, असे देखील श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी यावेळी राज्यातील प्रत्येक भागात खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे क्रीडांगण आणि इतर सर्व सोयी सुविधा सरकारकडून केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था कायम असे स्तुत्य उपक्रम राबवून कोकणामधील सर्वच खेळाडूंना चांगला दर्जा निर्माण करून देईल आणि कोणत्याही पद्धतीने राजकारण न करता कोकणातील प्रतेक विद्यार्थी चांगला घडला पाहिजे आणि अधिकारी पदापर्यंत पोहोचला पाहिजे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडू चांगले बनवून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी जिजाऊ संघटना प्रयत्नशील आहे, पालघर जिल्ह्यातील प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याची मान नेहमी खाली गेलेली पाहायला मिळते त्यामुळे राजकारण सोडून जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असं मत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केलं

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget