एक्स्प्लोर

लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी केला इतक्या कोटीचा विक्रमी दंड वसुल

अनेक क्षेत्रांमध्ये मंदी आणि सरकारी तिजोरी देखील खाली होताना दिसू लागली. अनेक सरकारी विभागांमध्ये होणारी उलाढाल देखील याच काळात थांबली. पण, रत्नागिरी वाहतूक विभागाने मात्र लॉकडाऊनच्या काळात वेगळा विक्रम केला आहे.

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनची घोषणा झाली आणि सर्वच आघाडींवरची आर्थिक घडी विस्कटली. अनेक क्षेत्रांमध्ये मंदी आणि सरकारी तिजोरी देखील खाली होताना दिसू लागली. अनेक सरकारी विभागांमध्ये होणारी उलाढाल देखील याच काळात थांबली. पण, रत्नागिरी वाहतूक विभागाने मात्र लॉकडाऊनच्या काळात वेगळा विक्रम केला आहे. कारण, मागील दोन महिन्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 1 कोटींपेक्षा देखील जास्त दंड वसुल केला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर देखील अनेक वाहन चालक रस्त्यांवर फिरताना दिसत होते. वाहतूक विभाग असेल किंवा पोलीस यंत्रणा यांनी वारंवार आवाहन केल्यानंतर देखील ही संख्या काही कमी होताना दिसत नव्हती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर थेट नियमांवर बोट ठेवत कारवाईचा बडगा उभारला गेला. हेल्मेट नसणे, सीट बेल्टशिवाय गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर, चुकीच्या बाजुने गाडी चालवणे, योग्य कागदपत्रे नसणे, गाडीचा विमा नसणे, फॅन्सी नंबर प्लेट असणे आदी कारणांसाठी ही कारवाई केली गेली. यावेळी हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांकडून तब्बल 65 लाख 77 हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्यान वसुल केलेली ही दंडाची रक्कम आजवरची कमी काळात वसुल केलेली सर्वाधिक रक्कम ठरली आहे.

दंड आकारल्यानंतर चित्र दिसू लागले वेगळे

लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये चलता है या वाक्यानुसार अनेक वाहने रस्त्यावर दिसत होती. पण, कारवाई सुरू झाल्याचे कळल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ही संख्या कमी कमी होताना दिसू लागली. वाहन चालक देखील योग्य कारणाशिवाय बाहेर पडणे टाळू लागले. शिवाय, बाहेर पडायचे झाल्यास सर्व गोष्टींची काळजी घेत नियमांचं भंग होणार नाही याची देखील काळजी घेऊ लागले. परिणामी रस्त्यावर दिसणारी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली. तसेच सरकारी तिजोरीत देखील विक्रमी रक्कम जमी झाली. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात रस्त्यांवर वाहनांची संख्या जास्त होती. पण, दंड आकारणीला सुरूवात केल्यानंतर मात्र संख्या कमी होऊ लागली. परिणामी लॉकडाऊनच्या काळात नियमांचं पालन देखील झाले आणि रस्त्यावरची वर्दळ देखील कमी झाली. सध्या जिल्ह्या शिथिलता देण्यात आलेली आहे. पण, त्यानंतर देखील वाहन चालक नियमांचं पालन करताना दिसत आहे. अनेक वाहन चालक दंड भरण्यापेक्षा हेल्मेट विक घेत आहेत. ही बाब तशी सकारात्मक म्हणावी लागेल. कारण, यापूर्वी वारंवार आवाहन केल्यानंतर देखील वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण, आता मात्र त्यांच्याकडून नियम पाळले जात आहेत. शिवाय एक प्रकारची शिस्त देखील लागली आहे. ही बाब त्यांच्या दृष्टीने देखील चांगली असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

नियमांचे होते आहे पालन

आज घडीला वाहन चालकांकडून देखील कारवाईच्या भीतीने का असेना पण नियमांचे पालन होताना दिसत आहे. जवळपास 95 टक्क्यांपेक्षा  अधिक चालक आपल्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही याची काळजी घेतानाचे चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget