एक्स्प्लोर

'घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?', मंत्री रावसाहेब दानवेंची CM ठाकरेंवर टीका

राज्य संकटात असताना मुख्यमंत्री ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नसल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खरमरीत टीका केली आहे.

पैठण : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मंत्री दानवे आज पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं  घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी.  आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय, अशा शब्दात दानवेंनी टीका केली आहे. ते म्हणाले, या स्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षीही ते बांधावर गेले. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे. ही आपली माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असं दानवे म्हणाले. आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोक मोबाईल उघडून पाहातो आणि खिशात ठेवतो, असंही दानवे म्हणाले.

पवार, फडणवीसांसह काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर, 'मुख्यमंत्र्यांना घर सुटेना!' भाजपचा आरोप

आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार कोण चालवतंय काही कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेलं हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचं काय होईल काही सांगता येत नाही, असं दानवे म्हणाले. हे सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही, असं ते म्हणाले.

राजा प्रजेत गेला पाहिजे. प्रजेचं दु:ख वाटून घेतलं पाहिजे. त्या प्रजेचं कुटुंब हेच आपलं कुटुंब वाटलं पाहिजे. प्रजेच्या दु:खामध्ये सहभागी झालं पाहिजे. मात्र मुख्यमंत्री हे मी आणि माझे कुटुंब असं म्हणत घरात बसले आहेत, असं दानवे म्हणाले.

बळीराजाची स्वप्न 'पाण्यात', किसानपुत्रांचा एल्गार, सोशल मीडियावर #ओला_दुष्काळ ट्रेंड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
Hasan Mushrif: युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
Kagal Nagar Parishad: कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare  PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
Ahilyanagar Bibtya : अहिल्यानगरात वनविभागाने पकडलेला बिबट्या तो नव्हेच, ग्रामस्थांचा सवाल
Sheikh Hasina Verdict : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; कंटेनरची तीन-चार वाहनांना धडक, वाहतूक जाम
Hasan Mushrif: युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
युती अचानक का झाली? कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय का घ्यावा लागला, ईडी आरोपांचे काय? मुश्रीफ काय काय म्हणाले?
Kagal Nagar Parishad: कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
कोल्हापूरच्या राजकीय विद्यापीठात अवघ्या 24 तासात राजकीय भूकंप; कागलला कट्टर वैरी एकत्र, नेमका फाॅर्म्युला ठरला तरी काय?
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजी सेन्सेक्स 388 अंकांनी वधारला, निफ्टी 26000 हजारांच्या पार, कारण समोर
शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 388 अंकांनी वधारला, निफ्टी 26000 हजारांच्या पार, कारण समोर
Rajan Salvi: म्हणून माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं; शिंदे गटाच्या राजन साळवींचं स्पष्टीकरण, नाराजीवरही भाष्य
म्हणून माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं; शिंदे गटाच्या राजन साळवींचं स्पष्टीकरण, नाराजीवरही भाष्य
ICT Verdict on Sheikh Hasina: फाशीची शिक्षा सुनावलेल्या शेख हसीना यांना भारत बांगलादेशात पाठवणार? काय सांगतो नियम?
फाशीची शिक्षा सुनावलेल्या शेख हसीना यांना भारत बांगलादेशात पाठवणार? काय सांगतो नियम?
पुणे हादरलं! शहरात पु्न्हा एकदा दिवसाढवळ्या तरुणाला संपवलं; सिंहगड कॉलेज परिसरातील घटना
पुणे हादरलं! शहरात पु्न्हा एकदा दिवसाढवळ्या तरुणाला संपवलं; सिंहगड कॉलेज परिसरातील घटना
Embed widget