एक्स्प्लोर

बळीराजाची स्वप्न 'पाण्यात', किसानपुत्रांचा एल्गार, सोशल मीडियावर #ओला_दुष्काळ ट्रेंड

महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. यात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरावं आणि तात्काळ मदत घोषित करावी यासाठी शेतकरीपुत्रांनी सोशल मीडियावर काल ओला दुष्काळ हा ट्रेंड चालवला.

मुंबई : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून सावरावं आणि तात्काळ मदत घोषित करावी यासाठी शेतकरीपुत्रांनी सोशल मीडियावर काल ओला दुष्काळ हा ट्रेंड चालवला. काल सायंकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान हा ट्रेंड टॉपवर होता.

राज्य सरकारकडून पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिलेला नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, अशी शेतकरी पुत्रांची भावना आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. तर सोलापूर, उस्मानाबादमध्ये तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्याचं दिसलं. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.

सातत्याने होणारे नुकसान, त्यात कोणत्याही प्रसंगात मदत न मिळणे, यामुळे अतिशय गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उपस्थित झाले आहेत.  सातत्याने विनंती करूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर 25 आणि 50 हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरून तर शेतकर्‍यांना आणखी वेदना होत आहेत. मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तिथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे, असं किसानपुत्रांचे म्हणणे आहे.

अतिवृष्टीमुळं शेती आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान त्याचा अंत आता बघू नका, लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा, असं स्वरुप रहाणे यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, डोळ्यादेखत अस्मानीनं होत्याचं नव्हतं झालंय. आयुष्याचं स्वप्न, पोरांच शिक्षण,पोरीचं लग्न, म्हाताऱ्यांचा औषधोपचार, इतकंच नव्हे कुटुंब जगवायचं कसं अशा अनेक प्रश्नांत शेतकरी जगण्याची उमेद हरवू शकतोय. सरकारने त्वरीत #ओला_दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करावी.

वैभव वाघ म्हणतात, जगाचा पोशिंदा जे नेहमीच असणाऱ्या अनिश्चित नैसर्गिक धोक्याला स्वीकारुन कर्तव्य पार पाडत असतात..सध्या ते संकटात आहेत..त्यांना दिलासा हवाय संकटाशी लढायला पाठबळ हवंय. शेतकऱ्यांचे अश्रू लाव्हारसात बदल्याआधी सरकारनं निर्णय घ्यावा.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Balasaheb Thorat on Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
सुप्रिया सुळेंच्या 'त्या' विधानावर बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला; विधान परिषदेतील माघारीवरून महाविकास आघाडीत जुंपली
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Sudhir Mungantiwar: सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला; असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये; सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला; असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नये; सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget