एक्स्प्लोर

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून गोंधळ निर्माण करायची आवश्यकता होती का? राज ठाकरेंचा सवाल

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदयादी (NRC) सारखे कायदे केवळ गोंधळ निर्माण करणारे आहेत, त्याची आवश्यकता नव्हती, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) देशभरातून अनेक लोक विरोध करत आहेत. CAA विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. तसेच राज यांनी CAA, NRC सारखे कायदे केवळ गोंधळ निर्माण करणारे आहेत, त्याची आवश्यकता नव्हती, असे मत व्यक्त केले.

राज ठाकरे म्हणाले की, CAA द्वारे भारत इतर देशातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन, जैन लोकांचा स्वीकार करेल. परंतु देशाची लोकसंख्या 135 कोटी इतकी आहे. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार? सर्वांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. लोकांच्या सोयीसाठी हा देश नाही. माणुसकीचा ठेका केवळ भारताने घेतलेला नाही.

राज ठाकरे म्हणाले की, घुसखोरी करणाऱ्या लोकांना देशातून बाहेर काढायचे असेल, तर त्यासाठी आपले पोलीस सक्षम आहेत. पोलिसांना माहित आहे की, बाहेरच्या देशातून आलेले लोक, प्रामुख्याने बांगलादेशातून आलेले घुसखोर कुठे राहतात? केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवायला हवी. आपल्याला शासकीय यंत्रणा सुधारण्याची गरज आहे, कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

राज म्हणाले की, घुसखोरांना शोधण्यासाठी, त्यांची हकालपट्टी करण्यासाठी आंतरराज्यीय स्थलांतर कायदा (interstate migration act) आहे. या कायद्याचा वापर करुन प्रत्येक राज्य सरकार घुसखोरांवर कारवाई करु शकतं. परंतु त्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना मोकळीक द्यायला हवी. महाराष्ट्र सरकारनेही आपल्या पोलिसांचा हात मोकळा करावा, त्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील.

राज ठाकरे यांनी याबाबत युरोपीय देशांचे एक उदाहरण दिले. राज म्हणाले युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली तसेच अमेरिकेसारख्या देशांमध्ये तिथले पोलीस स्वतः संशयितांची चौकशी करतात. अशा वेळी घुसखोर सापडले की, आम्ही तुम्हाला तुमच्या मायदेशी पाठवतो अथवा तुरुंगात पाठवू असे दोन पर्याय त्यांच्यासमोर ठेवतात. अशा प्रकारची कारवाई आपले महारष्ट्र पोलीसदेखील करु शकतात. विशेष म्हणजे पोलिसांकडे मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या घुसखोरांची माहिती आहे. असे असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून गोंधळ घालण्याची आवश्यकता होती का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! विदर्भातल्या अमरावती वर्धा अन् अकोल्यात उष्णतेची लाट, तर नागपूरसह पाच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट
राज्यात उन्हामुळे काहिली! विदर्भातल्या अमरावती वर्धा अन् अकोल्यात उष्णतेची लाट, तर नागपूरसह पाच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट
Maharashtra News LIVE Updates: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE: मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भडका, तर आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू; सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Dr.Anand Nadkarni Passes Away: 'शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट' काळाच्या पडद्याआड! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन
'शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट' काळाच्या पडद्याआड! ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन
Petrol and Diesel price hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol and Diesel price hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sharad Pawar On Sunil Tatkare And Praful Patel: शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन्ही नेते...
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Embed widget