एक्स्प्लोर

'त्या' विषयावर राजकारण नको, राहुल नार्वेकरांच्या भावाचे थेट मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांना पत्र

रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने पारदशर्कता ठेवावी अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबई :  मुंबईतील (Mumbai News) अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल  महालक्ष्मी रेसकोर्सच्या (Mumbai Race Course)   महागड्या जागेवरून  राजकारण रंगलंय. कारण आदित्य ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केला त्यानंतर  रेसकोर्स चर्चेत आले. आता या आरोप प्रत्यारोपाच्या राजरणात भाजपने घेतली असून महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असा थेट इशारा भाजपचे (BJP) माजी नगरसेवक आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू  मकरंद नार्वेकर (Makrand Narwekar)  यांनी  आदित्य ठाकरेंना दिला आहे.  

मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.  सरकारच्या जवळ असणाऱ्या बिल्डरकडून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकावत असल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला होता. आता भाजपचे माजी नगरसेवक आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनीही या वादात उडी घेतली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये असा इशारा देतानाच रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने पारदशर्कता ठेवावी अशीही मागणी केली आहे. मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे.

काय म्हणाले नार्वेकर आपल्या पत्रात?

जागतिक दर्जाच्या थीम पार्कसह महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित नूतनीकरणाच्या तुमच्या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो. रेसकोर्स प्लॉटवरील काही जागा थीम पार्कसाठी वापरण्याच्या  प्रलंबित मागणीवर  निर्णय घेतल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. मात्र, काही राजकारण्यांकडून गैरसमज निर्माण करून प्रसिद्धीसाठी राज्य सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी आणि रहिवासी संघटनांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गैरसमज टाळण्यासाठी, योजनेची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि हा पुनर्विकास अडकणार नाही याची खात्री करण्यासाठी उच्चाधिकार समिती (HPC) स्थापन करावी अशी माझी मागणी आहे. 

महालक्ष्मी रेसकोर्सच्या दुरुस्तीमध्ये मुंबईतील अनेक राज्य सरकारी विभाग आणि एजन्सींचा समावेश आहे. तर, मुख्य सचिव आणि महसूल विभाग, नगर विकास विभाग, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण विभाग यांचे प्रधान सचिव आणि प्रमुख सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक HPC स्थापन करणे योग्य होईल आणि त्याचे अध्यक्ष सदस्य असावेत.  रेसकोर्सच्या जमिनीच्या सुधारणेचा आराखडा अंतिम केला पाहिजे आणि नियमित अंतराने राज्य मंत्रिमंडळ आणि लोकांना माहिती दिली पाहिजे. HPC ने पारदर्शक आणि खुल्या पद्धतीने काम केले पाहिजे कारण रेस कोर्सची जमीन ही सर्वात मोठ्या खुल्या जागांपैकी एक आहे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकल्पाचा संपूर्ण शहरावर परिणाम होत आहे. 

शहरातील मोकळ्या जागा वाचवण्यासाठी अनेक दशकांपासून अनेक लढाया लढलेले नागरिक हे प्रशासनात समान भागधारक आहेत. त्यामुळे सुधार योजनेबाबत त्यांना विश्वासात घेतले पाहिजे; सुधारित आराखड्याशी संबंधित सर्व माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि त्याबाबत त्यांच्या सूचना मागवल्या जाव्यात. मला आशा आहे की, नेहमीप्रमाणे, तुम्ही या प्रकरणात अनुकूल निर्णय घ्याल 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget