एक्स्प्लोर

सोलापुरात जामिनावर सोडलेल्या कैद्याला कोरोनाची लागण, कारागृहातील 45 जणांचे स्वॅब घेतले

जवळपास अडीच महिने हा आरोपी जेलमध्येच होता. 22 मे रोजी अचानक ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कुठे झाली? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय.

सोलापूर : जवळपास अडीच महिने तुरुंगात असलेल्या कैद्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सोलापुरतील कारागृहातील 45 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. 22 मे रोजी आजारी असल्याने सोलापुरातील कारागृहातून एका कैद्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कैद्याला न्यायालयाकडून 23 मे रोजी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र 24 मे रोजी रात्री या जामिनावर मुक्त करण्यात आलेल्या आरोपीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे.
11 मार्च रोजी जबरी चोरीच्या आरोपात या आरोपीला जिल्हा मध्यवर्ती कारगृहात रवाना करण्यात आले होते. जवळपास अडीच महिने हा आरोपी जेलमध्येच होता. मात्र 22 मे रोजी अचानक ताप आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण कुठे झाली? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकरणी सदर कैद्याला कोरोनाची लागण कुठून झाली याचा शोध सुरु असून त्याच्या संपर्कातील 45 जणांचे स्वॅब घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कैद्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळताच कारागृह प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेतली आहे. कारागृहातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कैद्यांचे स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारागृह परिसरात निर्जंतुकीकरण देखील करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 141 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात 317 कैदी कारागृहात आहेत. या आधी जिल्हा कारागृहात 401 कैदी होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जवळपास 84 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासन वरिष्ठ प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांनुसार नियमितपणे कैद्यांची देखरेख करत होतं. कारागृहातील कैद्यांच्या आहारात बदल देखील करण्यात आला होता. कारागृहात येणाऱ्या प्रत्येकास हाताची स्वच्छता करण्यास सांगितले जात होते. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे ही प्रयत्न कारागृहात केले जात आहेत. याशिवाय नवीन येणाऱ्या कैद्यांसाठी नियमित बॅरेकमध्ये न ठेवता तात्पुरत्या जेलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. इतकी खबरदारी घेतल्यानंतर देखील या बंदीस कोरोनाची लागण कुठे झाली याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget