एक्स्प्लोर

Solar Eclipse : भारतीयांनी पाहिलं वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; संध्याकाळी 4.49 वाजता ग्रहण स्पर्श, तर सुर्यास्तासोबत ग्रहण संपणार

Solar Eclipse : राज्यभरात विविध भागातून आज नागरिकांमध्ये सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता पाहायला मिळाली. 2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज होत आहे.

Solar Eclipse : 2022 या वर्षातील दुसरे आणि शेवटचे आंशिक सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज होत आहे. हे सुर्यग्रहण आज दिसले असले तरी ग्रहणाचा सुतक कालावधी मात्र काल रात्रीपासून सुरू झाला आहे. म्हणजेच सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या आधी 12 तास आधी सुरू झाला. सूर्यग्रहण भारतात दिसत असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध आहे. यामुळे ग्रहणाशी संबंधित सर्व धार्मिक मान्यता पाळल्या गेल्या. मंगळवारी सकाळी 11 वाजून 28 मिनिटापासून सूर्यग्रहण सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटापर्यंत हे सूर्यग्रहण राहणार आहे. पण भारतात हे ग्रहण 4 वाजून 49 मिनिटापासून दिसायला सुरुवात (स्पर्श) झाली आणि 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहिले. भारतात ग्रहणाचा मोक्ष काळ सूर्यास्तानंतरच आहे. राज्यभरात विविध भागातून आज नागरिकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता पाहायला मिळाली.  

मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तर ठाण्याच्या कोलशेत खाडी येथे  नागरिकांसाठी विशेष सूर्यग्रहण बघण्याचे आयोजन करण्यात आले होते. Amature astronomy club यांच्यातर्फे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांना सोलार गॉगल देखील देण्यात आले होते. 

रत्नागिरीमधून 20 टक्के सूर्यग्रहण  दिसले.  4 वाजून 55 मिनिटांपासून 6.02 मिनिटांपर्यंत रत्नागिरीमधून सूर्यग्रहण दिसले. नागरिकांनी सूर्यग्रहण पाण्यासाठी गर्दी केली होती. रत्नागिरीमधून दिसणाऱ्या सूर्यग्रहणचा मध्यबिंदू 5.45 वाजता होता. रत्नागिरीमध्ये  6.09 वाजता सूर्यास्त झाला. 

नागपूरमध्ये ग्रहण बघण्याची विशेष सोय
नागपूरच्या रमण सायन्स विज्ञान केंद्रामध्ये नागरिकांसाठी हे ग्रहण बघण्याची विशेष सोय करण्यात आली. टेलिस्कोपच्या माध्यमातून नागपूरकरांनी हे ग्रहण पाहिले. यावेळी ग्रहण बघण्यासाठी विशेष गॉगलची पण व्यवस्था येथे  करण्यात आली होती. 

शिर्डीत मुख्य दर्शन लाईन बंद

देशभरातील मंदिरात आज ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रथा असून शिर्डीच्या साईमंदिरात ग्रहण सुरू होताच मुख्य दर्शन रांग बंद करण्यात आली.  मुख्य गाभाऱ्यात मंत्रोच्चार करण्यात आला.  समाधी मंदिरात साईबाबांच्या समाधीवर तुळशीपत्र ठेऊन मंत्रोच्चाराला  प्रारंभ झाला. आरती झाल्यानंतर मुख्य दर्शन रांग सुरू झाली. 

वाशिममध्ये नागरिकांची गर्दी
वाशिम जिल्ह्यात खंडग्रास सूर्यग्रहण 5 वाजून 9 मी पासून दिसण्यास सुरूवात झाली. लोकांनी विशेष गॉगलच्या साह्याने हे ग्रहण पाहिले. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणाहून या वेळी दिसले सूर्यग्रहण 

मुंबई  :  4 वाजून 49  मिनिटे  

पुणे :  4 वाजून  51 मिनिटे 

नाशिक :  4 वाजून 47 मिनिटे 

नागपूर : 4 वाजून 49 मिनिटे 

सोलापूर : 4 वाजून 54 मिनिटे 

औरंगाबाद : 4 वाजून 50 मिनिटे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget