एक्स्प्लोर

पीक विमा: 773 शेतकऱ्यांना एक रुपया, 649 शेतकऱ्यांना दोन रुपये

बीडमधील शेतकरी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांची यादी पाहिली तर चकीत व्हाल.

बीड: शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम 1 रुपयांपासून ते अनेक रुपयांपर्यंत जमा झाल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र हे एकाच शेतकऱ्याच्या बाबतीत झाला असेल असा आपला समज असतो. पण बीडमधील शेतकरी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांची यादी पाहिली तर चकीत व्हाल. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 आणि दोन रुपये अशी रक्कम टाकून विमा कंपनीनं शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. बीडमधील 773 शेतकऱ्यांना एक रुपया,649 शेतकऱ्यांना दोन रुपये,50  शेतकऱ्यांना तीन रुपये, 702  शेतकऱ्यांना चार रुपये, 39 शेतकऱ्यांना पाच रुपये एवढीच रक्कम खात्यावर जमा झाली आहे. पिकांचं नुकासन झालं म्हणून या शेतकऱ्यांना एव्हढी ‘मोठी’ रक्कम पीकविम्यारुपी भरपाई म्हणून मिळाली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदुरघाट शाखेत शेतकरी गेल्यानंतर त्यांना पीकविम्याची यादी पाहून धक्काच बसला. आपल्या नावावर 1 ते 5 रुपयांपर्यंत रक्कम जमा झाल्याचं पाहून हसावं की रडावं हेच त्यांना कळत नव्हतं. खरंतर बीड जिल्ह्यानं पीक विमा भरून घेण्यात देशात पहिला नंबर मिळवला होता. जिल्हा बँकेच्या नांदुरघाट शाखेतून 15691 शेतकऱ्यांनी युनाटेड इन्शुरन्स कंपनीकडे 51 लाख 42 हजार रुपयांचा विम्याचा हप्ता भरला होता. मात्र विमा कंपनीने भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर एक दोन रुपये टाकून क्रूर थट्टा केली आहे. लहरी हवामान, पावसाची अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे नापिकी झाल्यास शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारनं पीकविमा योजना आणली. पण पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरु आहे. विमा कंपन्या मात्र हजारो कोटी रुपयांचा नफा कमतवत तुंबड्या भरत आहेत. तर दुसरीकडे गरीब शेतकरी आणखी कंगाल होत आहे. त्यामुळे सरकारची पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget