एक्स्प्लोर

पालघर भूकंपग्रस्त भागांत एनडीआरएफचे तंबू तैनात

या भूकंपाचे विश्लेषण करण्यासाठी नॅशनल जिओग्राफीकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद आणि दिल्ली येथून तज्ज्ञ दाखल झाले असून तीन ठिकाणी यासंबंधीची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे.

डहाणू (पालघर)  :  जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्यांमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रहिवाशांनी घराबाहेर झोपण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. यादृष्टीने त्यांच्या सोयीसाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून एनडीआरएफचे तंबू मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून शनिवारी या तंबूंचे संबंधित ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले आहे. त्या प्रमाणे 42 ठिकाणी 200 तंबू उभारण्यात ही आले आहेत डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या भागात रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आल्यानंतर शनिवारी सकाळी पुणे येथून ही टीम दाखल झाली. त्यांच्यामार्फत भूकंपग्रस्त गावांमध्ये 200 तंबू उभारण्यात आले आहेत. सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी धुंदलवाडी येथे आढावा बैठक घेऊन आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतींना या तंबूंचे वाटप केले. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग, तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे, सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या परिसरात राबविण्यात येत असलेल्या यंत्रणेबद्दल माहिती देताना कटियार म्हणाले, डहाणूमधील 15 आणि तलासरीमधील सात गावे भूकंपाच्या धक्क्यांमुळे प्रभावित झाली आहेत. या भूकंपाचे विश्लेषण करण्यासाठी नॅशनल जिओग्राफीकल रिसर्च  इन्स्टिट्यूट, हैद्राबाद आणि दिल्ली येथून तज्ज्ञ दाखल झाले असून तीन ठिकाणी यासंबंधीची यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली आहे. महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी येथील परिस्थितीबाबत दक्ष आहेत. रहिवाशांच्या सोयीसाठी एनडीआरएफ च्या 200 तंबूंसह 70 ते 80 लोकांची सोय होईल असे आणखी मोठे तंबू लावले जात आहेत. विद्यार्थ्यांचीही सोय लक्षात घेऊन हे तंबू विशेषत: शाळा आणि आश्रमशाळांच्या आवारात लावले जात आहेत. याशिवाय 3 रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत येथे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा केला जाणार आहे. भूकंपामुळे रात्री घराबाहेर झोपण्याचे आवाहन प्रशासनाने केल्याच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांमध्ये सुरक्षेची भावना राखण्यासाठी तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलीस दल कार्यरत असून तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकारी, पाच कर्मचारी आणि 11 जणांचे प्लाटून संपूर्ण परिसरात गस्त घालत असल्याची माहिती परिविक्षाधीन अधिकारी (भापोसे) श्रवण दत्त एस. तसेच पोलीस उपअधीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली. पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम - 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल - 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल - 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल - 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल - 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल - 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल - 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल - 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल संबंधित बातम्या पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू

VIDEO | पालघर जिल्ह्यात भूकंपाचे दिवसभरात पाच धक्के! | एबीपी माझा

पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर जिल्हा जेरीस, नागरिक धास्तावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget