एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील 6 जणांचे पार्थिव महाराष्ट्रात कसे आणले जाणार? व्यवस्था कशी? मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये, जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Pahalgam Terror Attack:पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे . या सहा पर्यटकांचे पार्थिव एअर इंडियाच्या तीन विमानांमधून महाराष्ट्रात आणले जाणार आहेत .यातील चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानांनी मुंबईत येणार आहेत . दोन पार्थिव व पुण्यात आणले जाणार आहेत . मुंबईमध्ये मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर असतील .तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ या उपस्थित असतील .पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व्यवस्थितकडे लक्ष देतायत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना दिली .

विमानतळावर मंत्री उपस्थित

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला जाऊन तिथे असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी समन्वय साधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .ज्या ज्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच एसएमएस करून प्रशासनाशी संपर्क साधला आहे त्या सर्व पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली आहे . त्यातील काही लोक इंडिगोच्या विशेष विमानातून परत येणार आहेत .आज दिवसभरात कोणाकोणाला परत येण्यासाठी व्यवस्थेची गरज आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे .

विमानतळावर कडेकोड बंदोबस्त

हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव घेऊन जाणारे विमान श्रीनगर होऊन दुपारी 1.15 वाजता निघाले ते आता मुंबईला पोहोचेल .पुण्याहून कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी पुण्यात आणले जाणार आहे .पुण्याहून हे विमान सायंकाळी सहा वाजता निघेल .या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे .

मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या परिवाराला 5 लाखांची मदत

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या वॉर रूममध्ये  सगळ्या व्यवस्था उभ्या करण्यात आले आहेत .यावरून मध्ये कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल ती देता येणार आहे .पहलगामचा हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांवर सध्या उपचार सुरू आहेत .जखमींना डॉक्टरांनी जाण्याचे परवानगी दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात आणलं जाणार आहे .

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Pandharpur : विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
ST Bus Fare Hike : एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget