एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गावरील 'त्या' भीषण अपघाताची वर्षपूर्ती! नुसत्या आठवणींनी अंगाचा थरकाप, मात्र पीडित कुटुंबाचा अद्याप संघर्ष 

Samruddhi Expressway Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे एक वर्षापूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.

Wardha News वर्धा : नागपूरहून (Nagpur) पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे एक वर्षापूर्वी भीषण अपघात झाला होता. समुद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) इतिहासातला हा कदाचित सर्वात मोठा अपघात ठरला असावा. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले असून आजही त्या अपघाताची दाहकता अनेकांना हादरून देणारीच ठरली आहे.

एक वर्षापूर्वी घडलेल्या या अपघाताला आज वर्ष पूर्ण होत असल्याने यातील 25 मृतकांच्या कुटुंबाने वर्ध्यात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर सामूहिक वर्षश्राद्ध केले आहे. यावेळी शासनाने देऊ केलेल्या 25 लाख रुपयांच्या मदतीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. खासदार अमर काळे या वर्षश्राद्ध आंदोलनात सहभागी झालेत. यावेळी शोकाकुल  वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

यापेक्षा शरमेची गोष्ट कोणत्या सरकारसाठी नसावी- अमर काळे

नागपूरहून पुण्याला येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं अचानक पेट घेतला. त्यानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. तसेच शासनाकडून मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून सर्व मृतकांच्या कुटुंबाला आज रस्त्यावर वर्षश्राद्ध करावे लागले,  यापेक्षा शरमेची गोष्ट कोणत्या सरकारसाठी नसावी.अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारचे रस्त्यावर वर्षश्राद्ध करण्याची वेळ या पीडित कुटुंबावर या शासनाने आणली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी, असेही खासदार अमर काळे यावेळी म्हणाले.

समुद्धी महामार्गाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात

समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेड राजा 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले होते. 30 जूनच्या मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले. 25 प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला. अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची (vidarbha travels) खासगी बस होती. बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. कुणी शिक्षणासाठी घर सोडून पुण्याची वाट धरली होती तर कुणी नोकरीचा दिवस भरण्यासाठी आई-बाबांचा निरोप घेवून जन्मभूमी सोडून कर्मभूमीची वाट धरली होती.  त्यांना कुठं ठावूक होतं की हा निरोप शेवटचा असेल.

पीडित कुटुंबाचा मात्र अद्याप संघर्षच!

तिकीट काढताना त्यांना वाटलंही नसेल, त्यांचा हा प्रवास शेवटचा असेल समुद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात ठरला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लक्ष रुपये मदतीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात राज्याकडून 5 लाख तर केंद्राकडून 2  लाखांचीच मदत मिळाली. शिल्लक मदतीसाठी वारंवार सत्ताधाऱ्यांना भेटल्यावरही काहीच झाले नाही. घटनेनंतर आरोपींवर कमकुवत कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याने त्यांना लगेच जामीन मिळाला. मात्र यातील पीडित अद्याप या अपघातातून सावरले नसून प्रशासनानेही त्यांची अवहेलनाचं केल्याची प्रतिक्रिया अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
Embed widget