एक्स्प्लोर

शेतकरी अंगावर येतील या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदीत, जयंत पाटलांची टीका

आजवर कामगारांच्या हिताचे, कष्टकऱ्यांना संरक्षण देणारे कायदे आपण केले. परंतु, मोदी सरकार त्या विरोधात काम करत आहे, अशी टीका जयंत पाटलांनी केली.

जळगाव : नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी 60 दिवसांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकरी आपल्या अंगावर येऊन काहीतरी करतील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदी उभारून आत राहत आहेत. अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान यानेही 1771 साली मराठी फौजेपासून संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारली होती. म्हणून मला नरेंद्र मोदींमध्ये नजीब खान दिसत आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रात्री, भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याला माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते.

नवीन कृषी कायदे, कामगार कायद्यातील बदल या विषयांवरून मंत्री जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. ते पुढे म्हणाले, 2019 मध्ये देखील नरेंद्र मोदींची लोकप्रियता होती, असे मानूया. कारण त्यांच्या खासदारांची संख्या जास्त होती. परंतु त्यानंतर नरेंद्र मोदींनी 2 निर्णय घेतले. पहिल्या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. त्यामुळे तटबंदी उभारून मोदी आत राहत आहेत. स्टीलची रेलिंग असो, मोठमोठे खड्डे खोदून तसेच अर्धा ते एक फुटांपर्यंतचे खिळे उभारून मोदींनी तटबंदी तयार केली आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काहीतरी करतील, या भीतीने नरेंद्र मोदी तटबंदीत राहत आहेत. 1771 साली महादजी शिंदे यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल, या भीतीने अफगाणिस्थानातून आलेल्या नजीब खान याने देखील अशीच तटबंदी उभारली होती. मला नरेंद्र मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. नरेंद्र मोदींनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर हा विषय इतक्या टोकाला गेला नसता, असेही ते म्हणाले.

कामगार कायद्यातील बदल अन्यायकारक

कामगार कायद्यांच्या बाबतीतही जयंत पाटील यांनी मोदींवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींनी कामगार कायद्यात केलेले बदल अन्यायकारक आहेत. ज्या कंपनीत 300 पेक्षा कमी कामगार असतील, त्या ठिकाणी युनियन करता येणार नाही. आजवर कामगारांच्या हिताचे, कष्टकऱ्यांना संरक्षण देणारे कायदे आपण केले. परंतु, मोदी सरकार त्या विरोधात काम करत आहे. ज्यावेळी देशातील शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा असंतोष आणि विरोध वाढत जाईल, तेव्हा मोदींची लोकप्रियता अजून कमी होत जाईल. देशातील बदलत्या वातावरणात आपणही आपली भूमिका लोकांपर्यंत जाऊन मांडायला हवी, असेही जयंत पाटील म्हणाले.

मला छळण भाजपला महागात पडेल- एकनाथ खडसे

या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाजपला लक्ष्य केले. खडसे म्हणाले, नाथाभाऊला कसे तुरूंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे. आपण असे उद्योग केले नाहीत म्हणून भाजपला शोधूनही काहीही सापडले नाही. मला अडकवण्यासाठी छळण सुरू आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल, असा इशारा खडसेंनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा कहर! खडकवासला धरण तुडुंब भरलं; मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल दिसेनासा झाला; मेट्रो खांबांनाही पुराचा वेढा
पुण्यात पावसाचा कहर! खडकवासला धरण तुडुंब भरलं; मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल दिसेनासा झाला; मेट्रो खांबांनाही पुराचा वेढा
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Embed widget