Nashik Hospital Oxygen Leak Live : नाशिकमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या 24 वर
नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
LIVE
Background
नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता. त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टॅंकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर माहिती कळवली आहे, असं त्यांनी सांगितलं.
या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.
दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
वॉल्वमध्ये लीकेज असल्याने गळती : राजेश टोपे
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार? : प्रवीण दरेकर
नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
नाशिक मधील दुर्घटना प्रकरणी 7 सदस्यांनी समितीची घोषणा
नाशिक मधील दुर्घटना प्रकरणी 7 सदस्यांनी समितीची घोषणा, 10 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना, समितीने सादर केलेल्या एसओपी राज्याला मार्गदर्शक राहणार, त्यानुसार राज्यभर अंमलबजावणी होणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये दाखल
Nashik Hospital Oxygen Leak Live : आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये दाखल
https://marathi.abplive.com/news/maharashtra/nashik-hospital-oxygen-leak-live-updates-coronavirus-positive-22-patients-dead-983244
अंबाजोगाईच्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मदत द्यावी
अशी घडली घटना
दुपारी 12 वाजता टॅंकर ऑक्सिजन भरण्यासाठी दाखल झाला. आज टॅंकर आला तेव्हा लीक होत असल्याचं निदर्शनास आले. बारीक छिद्र होते त्यातून ऑक्सिजन लीक होत होता. आंतरराष्ट्रीय कंपनी 'टाय यो निपोन' यांच्या माध्यमातून ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे.
देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. कंपनीला ही माहिती कळवीत असतानाच छिद्र मोठे झाले आणि गॅस गळती वाढली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
दरम्यान ज्या पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा केला जातो तो पाईप बदलण्यात आला, यात साधारण एक ते दीड तास लागला. या दरम्यान 22 रुग्णांचे प्राण गेले.
यानंतर शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी ,पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.