एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नांदेडच्या लोह्यात रस्ताच नाही, गावकरी चिखलात उपोषणाला
![नांदेडच्या लोह्यात रस्ताच नाही, गावकरी चिखलात उपोषणाला Nanded No Road Constructed In Azamwadi Villagers On Hunger Strike नांदेडच्या लोह्यात रस्ताच नाही, गावकरी चिखलात उपोषणाला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/19140350/Nanded-Azamwadi-Road-Mud.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष लोटली, मात्र नांदेडमधील लोहा तालुक्यातल्या आजमवाडीत रस्ताच पोहोचलेला नाही. त्यामुळे आजमवाडीकर ओढ्यातील चिखल पाण्यातच आमरण उपोषणाला बसले आहेत.
लोहा तालुक्यापासून सात किलोमीटरवर असलेल्या आजमवाडीत चौथीपर्यंतच शाळा आहे. त्यामुळे गुडघाभर चिखल-पाण्यातून पायपीट करत मुलांना शाळेत जावं लागतं. रुग्णांना खाटेवरुन नेण्याशिवाय पर्याय नाही, तर शेतकऱ्यांना बाहेरुन कोणतीही वस्तू आणता येत नसल्यानं प्रचंड हाल होत आहेत.
या त्रासाला कंटाळलेल्या आजमवाडीकरांनी मंत्रालयापर्यंत खेटे मारले पण कुणीच दाद देत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कळवूनही या गावाला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे अखेरीस गावकऱ्यांनी या दलदलीतच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion