एक्स्प्लोर

रोहयो अंतर्गत बांधलेली विहिर महिन्यातच ढासळली, गरीब शेतकऱ्याचं मोठं नुकसान, सिमेंटच्या गुणवत्तेवर शंका

रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) बांधलेली विहीर महिनाभरातच ढासळल्याचा प्रकार नांदेडच्या (Nanded) रुई गावात घडला आहे.

Nanded : रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) बांधलेली विहीर महिनाभरातच ढासळल्याचा प्रकार नांदेडच्या (Nanded) रुई गावात घडला आहे. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने (Farmers) सिमेंटच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. विहीर महिनाभरातच ढासळल्यानं कामाच्या कार्यपद्धतीसह, विहीर बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या मालवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

नायगांव तालुक्यातील रुई येथील कामाजी मुकादम या शेतकऱ्याला रोहयो योजने अंतर्गत विहीर मंजूर झाली होती. प्रत्यक्षात या शेतकऱ्याला शासनाच्या अनुदानाचा रुपयाही अद्याप मिळाला नाही. या शेतकऱ्याने जवळच्या पैशातून विहिरीचे काम पूर्ण केले, पण अचानकपणे विहीर ढासळल्याने या शेतकऱ्याचे साडे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी करुन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. 

 रोजगार हमी योजनेबाबत माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मगांराग्रारोहयो) महाराष्ट्रात समस्त ग्रामीण भागात राभवली जाते. या योजनेच्या सहाय्याने देशातील बेरोजगार तरुणांना सरकारतर्फे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक मदत केली जाते. ही योजना खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खेडेगावातील प्रत्येक गरजू कुटुंबातील इच्छुक तरुणांना प्रत्येक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देते. लाभार्थी याद्वारे आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देतात. सहसा ही योजना श्रमदान च्या स्वरूपात असते. मगांराग्रारोहयो योजना ग्रामीण नागरिक, महिला व दुर्बळांचे सशक्तिकरण, शेतकरी व मजुरांचे आर्थिक रित्या मदत करून ग्रामीण भागाचा विकास सुनिश्चित करते. या योजनेमुळे रोजगाराचे साधन नसलेल्या अनेक कुटुंबांची रोजगाराची समस्या दूर होते.  

रोजगार हमी योजना सर्वप्रथम वसंतराव नाईक यांनी सुरू केली. वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लांब कार्यकीर्द (1963 - 1975) असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या शेती क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक आणि श्वेत क्रांतीचे जनक मानले जाते. एवढेच नाही तर 1 जुलै ही त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. 26 जानेवारी 1969 रोजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेची पायाभरणी केली. 1942 मध्ये जेव्हा दुष्काळाचे संकट लोकांवर आले. त्यावेळी रोजगार मिळणे हे अतिशय कठीण झाले. अशा संकटकाळी वसंतराव नाईक यांनी मांडलेली रोजगार हमी योजना राभविण्यात आली. योजना अतिशय यशस्वी ठरली आणि म्हणून 1970 मध्ये रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी झाली. पुढे 2005 रोजी ही योजना संपूर्ण भारतात लागू झाली.  

विविध कारणामुळं आधीच शेतकरी चिंतेत

विविध कारणामुळं आधीच शेतकरी चिंतेत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशातच पुन्हा अशी संकट येत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई देखील पाहायला मिळत आहे. अशा काळात शेतकरी पाण्याची व्यवस्था करण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : बाळ माने ओरीजनल भाजपचाच; निवडणुक आल्या तळ्यात-मळ्यात, 5 वर्षाची तडजोड ते करतात; नारायण राणेंची बोचरी टीका, विनायक राऊतांनाही सुनावलं!
बाळ माने ओरीजनल भाजपचाच; निवडणुक आल्या तळ्यात-मळ्यात, 5 वर्षाची तडजोड ते करतात; नारायण राणेंची बोचरी टीका, विनायक राऊतांनाही सुनावलं!
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Imtiaz Jaleel: मोठी बातमी: माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर? निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर? निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी मागणी मान्य; मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी मागणी मान्य; मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More:
"घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
Embed widget