एक्स्प्लोर

सांगलीतील शिराळा येथील नागपंचमी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण, नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खंडीत झाली आहे. मात्र शिराळामधील नागरिकानी देखील वन विभाग आणि पोलिसाच्या आवाहनास प्रतिसाद देत शांततेने आणि घरीच प्रतिकात्मक नागाचे पूजन करत साजरी केली.

सांगली : बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी सणाच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीला शिराळामधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिरात फक्त 5 लोकांना पूजेसाठी परवानगी तर पालखी सोहळ्यासाठी 10 लोकांना परवानगी दिली गेलीय. नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खंडीत झाली आहे. मात्र शिराळामधील नागरिकानी देखील वन विभाग आणि पोलिसाच्या आवाहनास प्रतिसाद देत शांततेने आणि घरीच प्रतिकात्मक नागाचे पूजन करत साजरी केली.

सांगली जिल्ह्यातील शिराळा गावामध्ये दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी उत्साहात साजरी केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मात्र मागील काही वर्षांपासून नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत. त्यात जिवंत नागाची पूजा करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे आता शिराळाकर हे प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. मात्र यंदा कोरोनामुळे या नागपंचमीवर आणखी एक सावट निर्माण झाले. कोरोनामुळे शिराळामधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्यात आले. यंदा मंदिरात जाऊन नाग प्रतिमेच्या पूजेला बंदी आली असली तरी हे सर्व बदल शिराळकर मोठ्या धैर्याने आत्मसात करून नागपंचमी त्याच उत्साहाने साजरी करत आहेत.

सांगलीतील शिराळा येथील नागपंचमी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण, नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

कोरोनामुळे प्रथमच अंबामाता मंदिरात लोकांच्याकडून होणारी नागप्रतिमा पूजा खंडित होणार आहे. ज्यावेळी जिवंत नागाची पूजा केली जात होती. त्यावेळी नागमंडळे प्रथम अंबामाता मंदिरात नागाची पूजा करून नंतर घरोघरी पूजा केली जात होती. जिवंत नागपूजेवर बंदी आल्यानंतर नागप्रतिमेची मंदिरात पूजा करून नंतर घरी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यास सुरुवात झाली.. सध्या कोरोना असल्याने अंबामाता मंदिरात नागप्रतिमेची पूजा करण्यास व दर्शन घेण्यासाठी बंदी असल्याने आता पहिल्यांदाच मंदिरात न जाता घरीच नागप्रतिमेची पूजा करून घरातूनच अंबामातेचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवावा लागत आहे. वनविभागाचे आणि पोलीस विभागाचे 164 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या भागात 24 ते 26 जुलैपर्यंत तीन दिवस ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे. वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सांगलीतील शिराळा येथील नागपंचमी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण, नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

शिराळाच्या नागपंचमीला मोठा इतिहास

शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. शिराळामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भीक्षा मागण्यास आले होते. यावेळी भीक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारला. त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने आपण नागाची पूजा करत होते असे सांगितले. त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे त्या महिलेला सांगितले आणि तेव्हापासून ही परंपरा शिराळामध्ये सुरू झाली. ही नागपंचमी पाहण्यासाठी काही वर्षांपूर्वी अनेक राज्यातून लोक येत होते. शिराळ्याच्या नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आम्हाला नागपंचमी करण्यास मिळावी, अशी भावना आजही व्यक्त करतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget