एक्स्प्लोर

Mumbai Ro Ro Services : ना रेल्वे तिकीटांचा तुटवडा, ना गोवा महामार्गावरील ट्रॅफिकचा तास; समुद्रमार्गाने मुंबई ते मालवण चार तासात प्रवास होणार

Mumbai To Kokan Ro Ro Services : जलमार्गाने जाणाऱ्या रोरो बोटीतून एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 गाड्यांचा प्रवास शक्य होणार आहे. कोकणात जाण्यासाठी आता फक्त चार तास पुरेसे होणार आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना यंदा रेल्वे तिकिटांचा तुटवडा, महामार्गावरील रखडलेली कामं किंवा वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. कारण आता मुंबईहून थेट कोकणात जलमार्गे म्हणजेच रोरो बोटने अवघ्या चार ते साडेचार तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. ही रोरो बोट भाऊच्या धक्का येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलवर दाखल होणार असून मुंबई ते मालवण अशी चाचणी देखील करण्यात येणार आहे.  

ही बोट M2M कंपनीची 55 कोटींची अत्याधुनिक रोरो बोट असून सागरी महामंडळाच्या सहकार्याने लवकरच ही सर्वसामान्याच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. रोरो बोट एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 वाहने घेऊन प्रवास करू शकते. विशेष म्हणजे, बोटीचा वेग 24 नॉटिकल माइल्स असून, ती अवघ्या चार ते साडेचार तासांत मुंबईहून रत्नागिरी, मालवण व विजयदुर्ग या ठिकाणी पोहोचू शकते.

Mumbai To Kokan Ro Ro Services : खासगी गाड्याही घेऊन जाता येणार

ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांसोबत त्यांची खासगी वाहनेही कोकणात जाता येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा प्रवास, इंधन खर्च आणि थकवा टळणार आहे. पावसाळ्यात सुद्धा जलवाहतूक शक्य होईल यासाठी ही बोट विशेष तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

या बोटीची चाचणी या आधी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते मांडवा मार्गावर घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. यामुळे अनेक वर्षांनंतर मुंबई ते कोकण जलवाहतूक मार्ग पुन्हा खुला होणार आहे. या सेवेमुळे कोकणात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आता जलमार्गाने आरामदायक आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

Mumbai To Kokan Ferry Boat Services : एम टू एम बोट मुंबईत दाखल

गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास. हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार आहे.

मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. यासंबंधी लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget