एक्स्प्लोर

थकहमीचा निर्णय फिरवून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला जातोय, सदाभाऊ खोत यांची टीका

केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत जाहीर केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 100 टक्के एफआरपी मिळाला पाहिजे, अन्यथा एकही कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सांगली : कारखानदारीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारायचा आणि तोच पैसा राजकारणासाठी वापरून सगे- सोयरे आणि बगलबच्चे गडगंज करायचे हे धोरण राज्य सरकारने हा थकहमीचा निर्णय फिरवून आखले आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. साखर कारखान्यांचा थकहमीचा निर्णय राज्य सरकारने फिरवत 37 साखर कारखान्यांना राज्य सरकारची थकहमी देत वैयक्तिक हमीची गरज नाही, या सरकारच्या निर्णयवर खोत बोलत होते.

शेतकऱ्याला रसातळाला घालवायचे आणि कारखानादारांना पोसायचा या सरकारचा हा उद्योग आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. इकडं शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो आहे. पण कारखान्यावर, सूतगिरणीवर किंवा दूध संघावर कर्ज झालं म्हणून एखाद्या संचालक, चेअरमन आत्महत्या केलीय हे मला दाखवा. शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यावर त्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाला 2 लाख देता पण जर यातील एखाद्या चेअरमन किंवा संचालकाने आत्महत्या केलेली असेल तर ती दाखवा आम्ही त्याला लोकवर्गणी काढून 10 लाख रुपये देतो, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

साखर कारखान्यांचा थकहमीचा निर्णय फिरवला, संचालकांवर सरकारी छत्र, वैयक्तिक हमीची गरज नाही

मागच्या सरकारने साखर कारखान्यांना थकहमी देत असताना कारखान्यांची बॅलन्स शीट पहिली जात होती. शिवाय थकबाकी देत असताना संचालकांना जबाबदार धरले जायचे. घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर केला जातोय की नाही हे पहिले जायचे. कारखाना काटकसरीने नाही चालवला तर त्या संचालकाना जबाबदार धरून त्याची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद त्या थकहमीच्या कायद्यात होती. मात्र ती तरतूदच या राज्य सरकारने काढून टाकली आहे. म्हणजे जनतेने कराच्या रुपात सरकारच्या तिजोरीत भरलेला पैसा, तो पैसा थकहमी न घेता कसाही वापरा, कारखाना तोट्यात घालवा मी तुम्ही नामानिराळे होऊन घरी जावा. तुमच्यावर कोण जप्ती काढणार नाही, तुम्हाला कोणीही नोटीस देणार नाही, असा न्याय जर त्या कारखानादाराना दिला जात असेल तर मग शेतकऱ्यांना हा न्याय का लावला जात नाही. शेतकर्‍यांनी खरेदी केलेला ट्रॅक्टर, पाईपलाईनसाठी घेतलेले कर्ज फिटले नाही तर त्या शेतकऱ्यावर जप्ती का लावली जाते, हा प्रश्न देखील सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत जाहीर केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 100 टक्के एफआरपी मिळाला पाहिजे, अन्यथा एकही कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. केंद्र सरकारने नुकतेच साखरेचा हमीभाव जाहीर केला आहे. 32 रुपये साखरेला आधारभूत किंमत केंद्र सरकारने अंतिम केली आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साखर कारखानदारांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून एक रकमी एफआरपी मिळण्यावरून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एक रकमी एफआरपी मिळवण्यासाठी शेतकरी संघटनांकडून दरवर्षी साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत, असं मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.

तसेच गेल्या पाच वर्षात भाजपच्याकडून राज्यात साखर कारखानदारांच्यावर कारवाईचा बडगा सुद्धा उगारण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात एफआरपी पडली होती. आता केंद्राने साखरेचे आधारभूत किंमत ठरवल्याने या पुढील काळात शेतकऱ्यांना देण्यात कसली अडचण निर्माण होण्याचा प्रश्न नाही. सध्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचे सर्वाधिक साखर कारखाने आहेत. त्यामुळे आता शंभर टक्के शेतकऱ्यांना एकरकमी कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचं जाहीर केलं नाही तर राज्यातला एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
NCP: तटकरे-प्रफुल पटेलांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाल्याचा भीमराव हत्तीहंबीरे यांचा आरोप, राष्ट्रवादीची ओबीसी अन् अल्पसंख्याक सेलच रद्द केल्यानंतर शरद पवार गटाची टीका
तटकरे-प्रफुल पटेलांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाल्याचा भीमराव हत्तीहंबीरे यांचा आरोप, राष्ट्रवादीची ओबीसी अन् अल्पसंख्याक सेलच रद्द केल्यानंतर शरद पवार गटाची टीका
Sushma Andhare on Rupali Chakankar : दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल, नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप
दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल, नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप
Shivdeep Lande: बायकोने वडिलांना स्वत:ची किडनी दिली, शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं'
बायकोने वडिलांना स्वत:ची किडनी दिली, शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Embed widget