एक्स्प्लोर

आभाळातून असा दिसतो जमिनीवरचा दुष्काळ

उस्मानाबाद (मराठवाडा): एबीपी माझानं भारतीय टेलीव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाचं दुष्काळ आकाशातून चित्रीत केला  आहे. यासाठी की महाराष्ट्र सावध रहावा. पावसाळा सुरु झाला की लगेच दुष्काळाचं सावट हटेल, सगळं अलबेल होईल, अशा भ्रमात कोणी असू नये. या वर्षीच्या दुष्काळानं मराठवाड्याच्या भूमीला असे तडे गेलेत की पाऊस वेळेवर सुरु झाला तरी स्थिती सुधारायला दोन महिने लागतील.     बर्ड आई व्हियू मधून दिसणारा दुष्काळ सांगतोय.. पुढचा काळही आव्हानाचा आहे. आव्हानाचं स्वरुप वेगळं असेल. गाफिल रहाल तर परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक चिघळेल.     Drone-dushkal-7   ५ हजार फुट उंचीवरून दिसणारं. मांजरा नदीवरचं बीड-उस्मानाबाद सीमेवरचं मांजरा धरण. २५० दशलक्ष घनमिटर पाणीसाठ्याचं. ज्या धरणाचं पाणी ४३ वर्ग किलोमिटर पर्यंत पसरतं. मांजरा १९८० नंतर पहिल्यांदाचं पूर्ण आटलं आहे. पाणी नसल्यानं धरणात मेलेले मासे, कासवं, शिंपल्यांचा खच पडला आहे. या हिरव्या पाण्याची वरपर्यंत दुर्गंधी येते.     बीड शहराला पाणीपुरवठा करणारा शहराजवळचा बिंदूसारा तलाव ९ एमएमक्युब क्षमतेचा बिंदुसारा फेब्रुवारी २०१५ पासून कोरडा आहे.     आभाळातून असा दिसतो जमिनीवरचा दुष्काळ   ५९८ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा क्षमतेचं तेरणा नदीवरचं माकणी धरण. धरणात फक्त ५ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. दोन आठवड्यात हेही पाणी संपेल. मराठवाड्यातल्या ११ पैकी ८  मोठ्या धरणात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. ८१४ लघु, ८५ मध्यम धरणं आणि ७२८ तलाव पुर्ण कोरडे पडले आहेत. ३ धरणात दीड टक्का पाणीसाठा आहे. चर्या खोदल्या तरी तलावात पाणी लागत नाही.     पाच हजार फुट उंचीवरून स्पष्ट दिसतं. मराठवाड्याच्या जमिनीचं वाळवंट होत चाललं आहे. आकाशातून ४०-४० वर्ग किलोमिटरपर्यंत नजर जाते. एवढ्या उंचीवरूनही ६४ लाख हेक्टर क्षेत्रफळातला हिरवा भाग शोधावा लागतो. पेरणी योग्य ५४ लाख हेक्टरवर गवताची पाती शिल्लक नाही.     Drone-dushkal-8   गोदावरी, मांजरा, तेरणा, पुर्णा, दुधना, लेंडी, कोणत्याच नदीपात्रात पाणी नाही. पाटोद्या जवळचं सौताड्याचं मांजरा नदीचं उगम स्थान. नदी कसली पांढरी रेघ दिसते.     परभणीजवळं गोदावरीत चार्या खोदून पाणी मिळवण्याचा गावकरी प्रयत्न करत आहेत. गोदावरीत पाण्याऐवजी धुरळा उडतो. नदी पात्रातल्या पाणी पुरवठ्याच्या ६ हजार विहीरी कोरड्या पडल्या आहेत. दोन-दोन किलोमिटर पर्यंतची पायपीट करून ग्रामस्थ पाण्याचा शोध घेत आहेत.     आभाळातून असा दिसतो जमिनीवरचा दुष्काळ   लातूर शहरात चार वाहनांमागं एक पाण्याचा टँकर धावताना दिसतो. १२ हजार टँकर ५ लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दिवसरात्र पाण्याच्या साठ्यावर गर्दी करतात. इथल्या पाण्याच्या टाक्या. निर्जीव वास्तू झाल्या आहेत. मराठवाड्यातल्या १२ मोठ्या शहरात दहा दिवसातून एक वेळेस पाणी येतं. शहर आणि ८ हजार ५२२ गावांतल्या ५६ लाख लोकांना पाणी पाजण्यासाठी साडेतीन हजार टँकर पळताना दिसतात. निजामानं बांधलेली ऐतिहासिक खजाना बावडी शतकात दुसऱ्यांदाच आटली.     बालाघाटच्या डोंगररांगा सुकल्या आहेत. डोंगरातली झाडी वाळून गेली आहे. जनावरे चाऱ्यासाठी रानोमाळ भटकताहेत. जंगलातले प्राण्यांचे पाणवठे आटले आहेत. मोर, हरणांच्या झुंडी पाण्याच्या शोधात आहेत. सामाजिक वनीकरणान लावलेली. वनं करपून गेली आहेत. हजारो झाडं मुळापासून जळून गेली आहेत. तीन वर्षापूर्वी फळांनी बहारलेल्या शेकडो फळबागा करपल्या. यातली किती फळझाडं पुन्हा जिवंत होतील आज सांगता येत नाही.     Drone-dushkal-73   शेड नेटच्या कापडाच्या सावलीत. मराठवाड्यात छावणी नावाच्या ३७३ नव्या वसाहती वसल्या आहेतं. पावणे चार लाख जनावरं. जनावरांना सांभाळणारी माणसं वस्तीला आहेत. पावसाळा वेळेवर सुरु झाला. तर या वसाहती लगेच उठून जातील पण या भेगाळलेल्या जमिनीत पाणी पाझरून नदी-नाले-कुपनलिका वाहत्या व्ह्यायला पावसाळ्याचे दोन महिने लागतील. या मरुभूमीत नवे कोंब फुटायला जुलै उजाडेल. तोपर्यंत टँकर सुरुच ठेवावे लागतील. प्रश्न आहे तो या दुष्काळानं पर्यावरण आणि माणसांच्या किती पिढ्यांचं नुकसान केलं आहे याचा... पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 
आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
Abhijeet Dipke: 'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
'विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक...' अभिजित दिपकेंचं देशातील सर्व शिक्षण मंत्र्यांना पत्र; शिक्षक भरती ते शाळांवर खर्च, सहा मुद्यांवर लक्ष वेधलं
Embed widget