एक्स्प्लोर

Marathi Sahitya Sammelan : सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात : दामोदर मावजो

Marathi Sahitya Sammelan : उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जोरदार करण्यात आली आहे.

Marathi Sahitya Sammelan : उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जोरदार करण्यात आली आहे. यावेळी संमेलनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. या दरम्यान, "आवडत नसलेले साहित्य जाळणे, बंदी घालणे योग्य नव्हे. सत्तेला माज चढतो, तेव्हा साहित्यावर निर्बंध लादले जातात. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. इंदिरा गांधी यांच्या काळात आणीबाणीला साहित्यिकांनी प्रखर विरोध केला. आज साहित्यात सत्ताधाऱ्यांना चिअर्स करणारे चिअर्स लिडर्स तयार झाले आहेत, हे दुर्दैव आहे" असे रोखठोक विधान 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख अतिथी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी केले आहे. 

यावेळी लेखक हा बंडखोरच असला पाहिजे असे विधान त्यांनी केले आहे. मला वाद नव्हे; संवाद आवडतो. मी कोकणी भाषक. कोकणीत लिहितो. मराठी लेखक आणि आपल्यात कधीच भाषावाद आला नाही. कोकणी आणि मराठीत द्वेष नको, वाद नको. पुढचे संमेलन गोव्यात घ्या. सर्व सहकार्य करू. सर्व वाद हे संवादातूनच मिटतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर कोकणी-मराठी नाते 600 -700 वर्षांचे आहे. संत नामदेव यांनी पंजाबी, उर्दू, कोकणी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषांत रचना केल्या. इतर भाषांतील शब्द संपदा स्वीकारल्यानेच मराठी समृद्ध झाली आहे. आज मराठी सर्वाधिक संपन्न भाषा असून, इतर बोलींचा आनंद घेता आला पाहिजे असेही ते म्हणाले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज : अशोक चव्हाण

यावेळी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “भाषा-भाषांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण करून मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध केली पाहिजे. मराठवाडा ही संतांची आणि चळवळीची भूमी आहे. ते अनेक भाषांचे आगर आहे. मराठवाड्यात तेलगु, उर्दू, कन्नड, मराठी भाषा बोलल्या जात असल्या तरीही येथे मराठी भाषेचा दबदबा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून पुस्तकांचे गाव उपक्रम राबविला पाहिजे.”असे अशोक चव्हाण म्हणाले. 

डिजिटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे : शिवराज पाटील चाकूरकर

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, “साहित्य हे व्यावहारिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा विविध पद्धतीचे असू शकते. इतर भाषेतील ग्रंथ मराठीत यावेत. कुराण, बायबल, उपनिषदे यासारखी अजरामर साहित्य निर्माण व्हावीत. येणारा काळ हा डिजिटल आहे. त्याचा मोठया प्रमाणावर वापर होणार आहे. यासाठी डिजिटल स्वरुपात साहित्य निर्माण व्हावे.” असे शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले. 

उदगीर जिल्हा व्हावा : बसवराज पाटील नागराळकर

संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर प्रास्ताविक करताना म्हणाले की, संस्थेचा हीरक महोत्सव साजरा होतो आहे आणि महामंडळाने संमेलन आयोजनाची जबाबदारी दिली आहे. उदगीर हा सीमा भाग आहे. मराठी, तेलगू, कानडी, हिंदी उर्दू भाषा बोलल्या जातात. या तालुक्याला इतिहास आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. ही संस्था नावाजलेली आहे. संमेलनात सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. येथे बालकुमार आणि पर्यावरण यावर चर्चा होणार आहे. या परिसरात 300 स्टॉल आणि 7 भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ग्राम पंचायतीच्या ठिकाणी संमेलन होत आहे, असे प्रथमच होत आहे. उदगीर हा जिल्हा व्हावा अशी मागणी बसवराज पाटील नागराळकर यांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget