एक्स्प्लोर

शिवसेना, भाजपमध्ये पुन्हा जवळीक वाढतेय!

मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन दूर गेलेली शिवसेना आणि भाजप पुन्हा जवळ येताना दिसत आहे. अलिकडील काही दिवसांमध्ये भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमधून याचे संकेत मिळत आहे.

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांतील घटनांमधून याचे संकेत मिळतायेत. ऑक्टोबर 2019 मध्ये एकत्र निवडणूक लढल्यानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. मात्र, सध्या भाजपच्या काही नेत्यांची वक्तव्य पाहाता ते शिवसेनेबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एनआरसीवर घेतलेल्या भूमिकेने या चर्चांना अधिक उधाण आलंय. भाजपने शिवसेनेसोबत अन्याय केला, ही आमची चुक असल्याचं वक्तव्य अर्थसंकल्पातील चर्चेवेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पुढे ते म्हणाले, की मान्य आहे आम्ही चूक केली. मात्र, भविष्यात ही चूक सुधारली जाऊ शकते. पण, याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीने घेणं चुकीचं होतं. सभागृहातील मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याने भाजपची शिवसेनेविषयी भूमिका सौम्य होत असल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीवारी मागच्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याला आपलं समर्थन असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. लोकसभेत हे विधेयक पास होत असतानाही शिवसेनेने याचं समर्थन केलं होतं. मात्र, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचा विरोध पाहता, राज्यसभेत हे विधेयक पास होताना सेनेने मतदानात भाग घेतला नव्हता. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याचं मुख्यमंत्र्यांनी उघड समर्थन केलं. यावरुन भाजप आणि शिवसेनेत जवळीक वाढत असल्याचं दिसून येतंय. अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय, तर पश्चिम महाराष्ट्रावर सरकार मेहरबान : देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तकाचे प्रकारशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांच्याकडे कटाक्ष टाकत या पुस्तकाचं प्रकाशन मला फडणवीस यांच्यामुळे करावं लागतय, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. याचा अर्थ त्यांनी मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं, तर ते स्वतः आज मुख्यमंत्री असते. शिवसेना आणि भाजपने 2019 ची विधानसभा निवडणूक युतीतर्फे लढले होते. निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष विभागून घ्यावे, अशी सेनेची मागणी होती. युतीअगोदर मुख्यमंत्रीपदाबद्दल ठरलं असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. मात्र, असा कोणताच करार आमच्यात झाला नसल्याचं भाजपचं म्हणणं होतं. यावर नाराज होत, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची 25 वर्षांहून अधिककाळाची युती तोडत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'! महाराष्ट्रात सत्तेसाठी भाजपकडून हालचाली महाराष्ट्र राज्य हे सर्वचं दृष्टीने खूप महत्वाचे राज्य मानले जाते. बऱ्याच ठिकाणी बहुमत नसताना भाजपने सत्ता मिळवली आहे. मात्र, राज्यात बहुमत असताना भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. अनेक मुद्द्यांवर महाविकासआघाडीमध्ये सुसंवाद नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे हे सरकार पडेल आणि शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात पुन्हा सरकार स्थापन करता येईल, अशी आशा भाजपला वाटत असल्यांचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. Ajit Pawar-Sudhir Mungantiwar | मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
Maharashtra Olympic Association : अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?
अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टं मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Nashik News: आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनाचा वाद चिघळला, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण? स्थानिकांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनाचा वाद चिघळला, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाण? स्थानिकांकडून गंभीर आरोप

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Embed widget